एनआरआय पतींनी सोडलेल्या पत्नींसाठी विधेयक
अनिवासी भारतीय पतींकडून सोडून दिलेल्या पत्नींची आर्थिक कोंडी होऊ नये यासाठी या पतींना धडा शिकवणे गरजेचे आहे. अशा एनआरआय 'महा ठक' पतिराजांवर कारवाई करण्यासाठी नवे विधेयक तयार करण्यात येत असून ते संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात मांडले जाईल, असे परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी बुधवारी येथे सांगितले. त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
Maharashtra Times 29 Nov 2018, 4:13 am
वृत्तसंस्था, हैदराबाद
अनिवासी भारतीय पतींकडून सोडून दिलेल्या पत्नींची आर्थिक कोंडी होऊ नये यासाठी या पतींना धडा शिकवणे गरजेचे आहे. अशा एनआरआय 'महा ठक' पतिराजांवर कारवाई करण्यासाठी नवे विधेयक तयार करण्यात येत असून ते संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात मांडले जाईल, असे परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी बुधवारी येथे सांगितले. त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
येत्या ७ डिसेंबर रोजी तेलंगण विधानसभा निवडणूक होणार आहे. भाजपच्या निवडणूक प्रचारासाठी त्या येथे आल्या होत्या. त्या म्हणाल्या, 'देशातील आपल्या पत्नींना फसवून, त्यांना वाऱ्यावर सोडून परदेशात गेलेल्या व अनिवासी भारतीय (एनआरआय) झालेल्या पतींविरोधात कारवाई करण्यासाठी संस्थात्मक प्रणाली तयार करण्यात आली आहे. त्याअंतर्गत २५ एनआरआय पतींचे पासपोर्ट रद्द करण्यात आले आहेत. आता या महिलांची आणखी परवड होऊ नये, यासाठी स्वतंत्र विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडले जाणार आहे.'
अनिवासी भारतीय पतींकडून सोडून दिलेल्या पत्नींची आर्थिक कोंडी होऊ नये यासाठी या पतींना धडा शिकवणे गरजेचे आहे. अशा एनआरआय 'महा ठक' पतिराजांवर कारवाई करण्यासाठी नवे विधेयक तयार करण्यात येत असून ते संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात मांडले जाईल, असे परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी बुधवारी येथे सांगितले. त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
येत्या ७ डिसेंबर रोजी तेलंगण विधानसभा निवडणूक होणार आहे. भाजपच्या निवडणूक प्रचारासाठी त्या येथे आल्या होत्या. त्या म्हणाल्या, 'देशातील आपल्या पत्नींना फसवून, त्यांना वाऱ्यावर सोडून परदेशात गेलेल्या व अनिवासी भारतीय (एनआरआय) झालेल्या पतींविरोधात कारवाई करण्यासाठी संस्थात्मक प्रणाली तयार करण्यात आली आहे. त्याअंतर्गत २५ एनआरआय पतींचे पासपोर्ट रद्द करण्यात आले आहेत. आता या महिलांची आणखी परवड होऊ नये, यासाठी स्वतंत्र विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडले जाणार आहे.'