चेन्नई:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी महाआघाडी आणि त्यात सहभागी झालेल्या पक्षांच्या नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. ही 'नापाक' आणि वैयक्तिक अस्तित्व राखण्यासाठी केलेली महाआघाडी आहे, असं ते म्हणाले. चेन्नईतील भाजप कार्यकर्त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना ते बोलत होते.
मोदींनी रविवारी तामिळनाडूमधील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चेन्नई मध्य, चेन्नई उत्तर, मदुराई, तिरुचिरापल्ली आणि तिरुवल्लूर मतदारसंघातील भाजपच्या बूथ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. 'आज अनेक जण महाआघाडीविषयी बोलत आहेत. पण ही महाआघाडी वैयक्तिक अस्तित्व वाचवण्यासाठी आहे. ती विचारधारेवर आधारित नाही. सत्तेसाठी ही महाआघाडी आहे, नागरिकांसाठी नाही. वैयक्तिक महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी असून, ती लोकांच्या अपेक्षा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नाही,' असं मोदी म्हणाले.
महाआघाडीतील प्रमुख असलेल्या तेलगू देसम पक्षाची स्थापना दिवंगत मुख्यमंत्री एनटी रामाराव यांनी काँग्रेसनं केलेल्या अन्यायाविरोधात केली होती. पण आता हाच पक्ष काँग्रेसशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न करत आहे. समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांच्यापासून प्रेरित झाल्याचा दावा महाआघाडीतील काही पक्षांनी आणि नेत्यांनी केला आहे. पण लोहिया हे स्वतः काँग्रेसच्या विचारधारेविरोधात होते, असंही मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी महाआघाडी आणि त्यात सहभागी झालेल्या पक्षांच्या नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. ही 'नापाक' आणि वैयक्तिक अस्तित्व राखण्यासाठी केलेली महाआघाडी आहे, असं ते म्हणाले. चेन्नईतील भाजप कार्यकर्त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना ते बोलत होते.
मोदींनी रविवारी तामिळनाडूमधील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चेन्नई मध्य, चेन्नई उत्तर, मदुराई, तिरुचिरापल्ली आणि तिरुवल्लूर मतदारसंघातील भाजपच्या बूथ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. 'आज अनेक जण महाआघाडीविषयी बोलत आहेत. पण ही महाआघाडी वैयक्तिक अस्तित्व वाचवण्यासाठी आहे. ती विचारधारेवर आधारित नाही. सत्तेसाठी ही महाआघाडी आहे, नागरिकांसाठी नाही. वैयक्तिक महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी असून, ती लोकांच्या अपेक्षा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नाही,' असं मोदी म्हणाले.
महाआघाडीतील प्रमुख असलेल्या तेलगू देसम पक्षाची स्थापना दिवंगत मुख्यमंत्री एनटी रामाराव यांनी काँग्रेसनं केलेल्या अन्यायाविरोधात केली होती. पण आता हाच पक्ष काँग्रेसशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न करत आहे. समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांच्यापासून प्रेरित झाल्याचा दावा महाआघाडीतील काही पक्षांनी आणि नेत्यांनी केला आहे. पण लोहिया हे स्वतः काँग्रेसच्या विचारधारेविरोधात होते, असंही मोदी म्हणाले.