अ‍ॅपशहर

नाणार प्रकल्प मार्गी

रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथे स्थानिकांच्या विरोधाला न जुमानता केंद्रातील मोदी सरकारने रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स (आरआरपीसीएल) या तीन लाख कोटी रुपयांच्या तेलशुद्धीकरण प्रकल्पासाठी सौदी अरमाको या सौदी अरेबियाच्या कंपनीसोबत बुधवारी निर्णायक पाऊल टाकले.

Maharashtra Times 12 Apr 2018, 6:12 am
म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nanar


रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथे स्थानिकांच्या विरोधाला न जुमानता केंद्रातील मोदी सरकारने रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स (आरआरपीसीएल) या तीन लाख कोटी रुपयांच्या तेलशुद्धीकरण प्रकल्पासाठी सौदी अरमाको या सौदी अरेबियाच्या कंपनीसोबत बुधवारी निर्णायक पाऊल टाकले. इंडियन ऑइल, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम या भारतीय तेल कंपन्यांनी सौदी अरमाकोसोबत हा प्रकल्प उभारण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. सौदी अरमाको या प्रकल्पात धोरणात्मक भागीदारीसाठीही प्रयत्न करीत आहे.

या प्रकल्पाची दररोज १२ लाख बॅरल किंवा वर्षाला ६० दशलक्ष मेट्रिक टन खनिज तेलावर प्रक्रिया करण्याची क्षमता असेल. बीएस-६ ग्रेडसारख्या इंधन पेट्रोल आणि डिझेलव्यतिरिक्त या प्रकल्पातून दरवर्षी १८ दशलक्ष टन विविध पेट्रोलियम पदार्थांचे उत्पादन अपेक्षित आहे. एकात्मिक पेट्रोकेमिकल संकुलाच्या उत्पादनातील महत्त्वाच्या घटकाचीही व्यवस्था या प्रकल्पात असेल. जगातील मोठ्या तेलशुद्धीकरण प्रकल्पांमध्ये या नाणारच्या प्रकल्पाची गणना होणार असून त्यामुळे भारताच्या खनिज इंधन आणि पेट्रोकेमिकल्सच्या वाढत्या गरजांची पूर्तता होणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज