अ‍ॅपशहर

मुलीला बारावीत कमी मार्क्स, वराने लग्न मोडलं, पण वधूच्या वडिलांचा वेगळाच आरोप, म्हणतात...

Wedding Called Off: लग्न ठरलं, तयारी झाली पण लग्नाच्या काही वेळापूर्वी वराने लग्न करण्यास नकार दिला. यासाठी त्याने जे कारण दिलं ते ऐकून साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. यानंतर हे प्रकरण थेट पोलिसांत गेलं, सध्या पोलीस या प्रकरणावर तोडगी काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

Authored byनुपूर उप्पल | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Mar 2023, 9:06 pm
लखनऊ: लग्न हे दोन व्यक्तींचं होत असलं तरी त्यामाध्यमातून दोन कुटुंब एक होत असतात. त्यामुळे लग्न ठरल्यानंतर ते लग्न मोडू नये यासाठी दोन्ही घरातील लोक प्रयत्न करत असतात. कारण, जर असं झालं तर दोन्ही घराचं मोठं आर्थिक आणि भावनिक हानी होते. गेल्या काही काळापासून अशी अनेक प्रकरणं पाहायला मिळत आहेत जिथे क्षुल्लक कारणांवरुन लग्न मोडत आहेत. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातही समोर आला आहे. ही घटना अत्यंत आश्चर्यकारक आहे. कारण, वधूला बाराव्या वर्गात कमी गुण मिळाले हे समजल्यावर वराने लग्नाला नकार दिला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bride


उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यातील तिरवा कोतवाली परिसरात ही विचित्र घटना घडली आहे. होणाऱ्या बायकोला बारावीत चांगले मार्क्स न मिळाल्याने आपण लग्न रद्द करत असल्याचे वराने वधूच्या वडिलांना कळवलं. पण, वराच्या निर्णयानंतर वधूच्या वडिलांनी सांगितले की, वराच्या कुटुंबाने हुंडा पुरेसा नसल्याने हे लग्न मोडलं आहे. वराच्या कुटुंबाने जितका हुंडा मागितला होता तितका वधू पक्ष देऊ शकला नाही, म्हणून लग्न मोडल्याचं सांगण्यात येत आहे.

लग्नघरी जात असताना वाटेत काळ आडवा आला, मंजुळकर दाम्पत्याने एकत्र जगाचा निरोप घेतला...
लग्नाच्या काहीवेळापूर्वी जेव्हा लग्नाची सारी तयारी झालेली होती तेव्हा वराने लग्न मोडत असल्याचं सांगितलं. त्यानंतर वधूच्या वडिलांनी याप्रकरणाबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली.

वडिलांनी तक्रारीत सांगितलं की, त्यांनी त्यांची मुलगी सोनीचं लग्न बगानवा गावातील रामशंकर यांचा मुलगा सोनू याच्याशी लावण्याचं ठरवलं होतं. वधूच्या वडिलांनी लग्नासाठी ६०,००० रुपये खर्च केले, ज्यात वरासाठी १५,००० रुपये किमतीची सोन्याची अंगठी होती. काही दिवसांनी वराच्या कुटुंबीयांनी हुंड्याची मागणी केली.

कॅडबरी, कुरकुरेचं आमिष, नातीच्या वयाच्या चिमुकलीवर वृद्धाकडून अत्याचार, मुळशीत संताप
मात्र, आम्ही अधिक हुंडा देऊ शकत नाही, वधूच्या वडिलांनी हे सांगताच वराच्या वधूच्या बारावीच्या मार्क्सवर असमाधान व्यक्त केलं आणि हे लग्न मोडत असल्याचं सांगितलं, असा आरोप वधूच्या वडिलांनी केला आहे. पोलिसांनी दोन्ही पक्षाचं म्हणणं ऐकलं असून वाटाघाटी करुन तोडगा काढण्याचा सल्ला पोलिसांनी दिला आहे.
लेखकाबद्दल
नुपूर उप्पल
नुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा... आणखी वाचा

महत्वाचे लेख