राजस्थान :
राजस्थानमधील बारन जिल्ह्यात हुंडा न मिळाल्याने नवरा मुलगा भर लग्नमंडपातून पळून जाण्याची घटना समोर आली आहे. हुंड्यासाठी पळून जाणाऱ्या नवऱ्याविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजस्थानच्या बारन जिल्हयात शुक्रवारी २२ वर्षीय नवरदेवाने हुंडा म्हणून दुचाकी गाडीची मागणी केली होती. ही मागणी मुलीच्या कुटुंबाकडून पूर्ण न झाल्याने नवऱ्याने भर लग्न मंडपातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. या घटनेनंतर नवरी मुलीने पोलिस ठाण्यात नवऱ्या मुलाविरूद्ध गुन्हा दाखल केला. मुलगा शनिवारी सकाळी परतल्यानंतर मुलानं लग्न वधुपक्षाकडे लग्नाला तयार असल्याची इच्छा व्यक्त केली. यावर दोन्ही कुटुंबानी एकत्र बसून या सम्येयवर तोडगा काढण्यास सहमती दर्शवली असून लग्नाचे विधी पुन्हा करण्यास दोन्ही कुंटुंबा तयार झाली आहेत.
तर पोलिसांनी देखील या प्रकरणाची चौकशी करण्यास सुरवात केली आहे.
राजस्थानमधील बारन जिल्ह्यात हुंडा न मिळाल्याने नवरा मुलगा भर लग्नमंडपातून पळून जाण्याची घटना समोर आली आहे. हुंड्यासाठी पळून जाणाऱ्या नवऱ्याविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजस्थानच्या बारन जिल्हयात शुक्रवारी २२ वर्षीय नवरदेवाने हुंडा म्हणून दुचाकी गाडीची मागणी केली होती. ही मागणी मुलीच्या कुटुंबाकडून पूर्ण न झाल्याने नवऱ्याने भर लग्न मंडपातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. या घटनेनंतर नवरी मुलीने पोलिस ठाण्यात नवऱ्या मुलाविरूद्ध गुन्हा दाखल केला. मुलगा शनिवारी सकाळी परतल्यानंतर मुलानं लग्न वधुपक्षाकडे लग्नाला तयार असल्याची इच्छा व्यक्त केली. यावर दोन्ही कुटुंबानी एकत्र बसून या सम्येयवर तोडगा काढण्यास सहमती दर्शवली असून लग्नाचे विधी पुन्हा करण्यास दोन्ही कुंटुंबा तयार झाली आहेत.
तर पोलिसांनी देखील या प्रकरणाची चौकशी करण्यास सुरवात केली आहे.