अ‍ॅपशहर

'GSTमुळं देशाच्या अर्थव्यवस्थेचा कायापालट'

'वस्तू व सेवा कर कायदा (जीएसटी) लागू होऊन अद्याप एक महिनाही झाला नाही. मात्र, आतापासूनच त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. ग्राहक, व्यापारी आणि सरकारमध्ये परस्पर विश्वास वाढला आहे,' असं सांगतानाच, 'जीएसटीमुळं देशाच्या अर्थव्यवस्थेचा कायापालट झाला आहे,' असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केला.

Maharashtra Times 30 Jul 2017, 1:00 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gst has transformed indias economy pm modi in mann ki baat
'GSTमुळं देशाच्या अर्थव्यवस्थेचा कायापालट'


'वस्तू व सेवा कर कायदा (जीएसटी) लागू होऊन अद्याप एक महिनाही झाला नाही. मात्र, आतापासूनच त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. ग्राहक, व्यापारी आणि सरकारमध्ये परस्पर विश्वास वाढला आहे,' असं सांगतानाच, 'जीएसटीमुळं देशाच्या अर्थव्यवस्थेचा कायापालट झाला आहे,' असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केला.

रेडिओवरून प्रसारित होणाऱ्या 'मन की बात' कार्यक्रमात ते बोलत होते. अर्थव्यवस्थेतील क्रांतिकारी सुधारणा म्हणून ओळखला गेलेला जीएसटी कायदा लागू होऊन ३१ जुलै रोजी एक महिना पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना मोदी यांनी जीएसटी कायद्याचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केलं. जीएसटीमुळे गरीबांवर कुठलाही भार पडणार नाही, याकडं प्रत्येक राज्य सरकारनं प्राधान्यानं लक्ष दिलं आहे. राज्य आणि केंद्र सरकार समन्वयानं काम करत आहेत. जीएसटी हे संघराज्यातील सहकार्याचं एक अनोखं उदाहरण म्हणून पुढं आलं आहे. इतक्या मोठ्या देशात जीएसटीची अंमलबजावणी हे यश आहे. येत्या काळात जगातील अर्थतज्ज्ञांसाठी हा अभ्यासाचा विषय ठरेल,' असं मोदी म्हणाले. याशिवाय, गेल्या महिनाभरातील अनेक क्षेत्रांतील घडामोडींवर पंतप्रधानांनी भाष्य केलं. यंदाच्या स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून होणारं भाषण छोटं असेल, असे संकेतही त्यांनी यावेळी दिले.

आणखी काय म्हणाले मोदी

>> आमच्या सुकन्या देशाचं नाव मोठं करत आहेत... वर्ल्ड कप जिंकण्याचं महिला क्रिकेट संघाचं स्वप्न पूर्ण झालं नाही... पण त्या सामना जिंकला नसल्या तरी देशवासीयांची मनं त्यांनी जिंकली आहेत.

>> भारत छोडो आंदोलनाचं हे ७५वं वर्षं आहे... त्यानिमित्त 'गंदगी भारत छोडो', 'गरीबी भारत छोडो', 'जातिवाद भारत छोडो', 'संप्रदायवाद भारत छोडो' असे संकल्प करू या... पाच वर्षांत त्याचे परिणाम दिसतील.

>> आज 'करेंगे या मरेंगे'ची गरज नसून नव्या भारताच्या निर्माणाचा संकल्प करायची गरज आहे, त्यासाठी जिद्दीनं लढण्याची आवश्यकता आहे.

>> पर्यावरणातील बदलांमुळे देशातील अनेक राज्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झालीय... पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कर, एनडीआरएफ, निमलष्करी दलाचे जवान झटत आहेत.

>> यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाचं १२५ वं वर्षं आहे... आपण सारे पर्यावरण-पूरक उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करू या...

>> सणांमुळे नात्यांमध्ये गोडवा येतो... आपले उत्सव गरीबांसोबत साजरे करू या, त्यांच्या अर्थव्यवस्थेशी जोडू या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज