अ‍ॅपशहर

परीक्षा केंद्रावरच काढला सेल्फी, २ वर्षांची बंदी

सध्या तरूणांमध्ये सेल्फीचे वेड वाढीस लागलेले दिसत असून त्यामुळे अनेकांचा जीवही धोक्यात आला आहे. अशीच एक घटना गुजरातमधील पोरबंदर येथे घडली असून सेल्फी वेडामुळे एका मुलाचे आयुष्यभराचे नुकसान झाले. परीक्षा केंद्रातच सेल्फी काढल्यामुळे वत्सल करामता या १७ वर्षीय विद्यार्थ्यावर गुजरात बोर्डाने दोन वर्षांची परीक्षा बंदी घातली.

Bharat Yagnik | Maharashtra Times 23 May 2017, 1:12 pm
अहमदाबाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gujarat class xii student takes selfie in exam hall barred for 2 years
परीक्षा केंद्रावरच काढला सेल्फी, २ वर्षांची बंदी


सध्या तरूणांमध्ये सेल्फीचे वेड वाढीस लागलेले दिसत असून त्यामुळे अनेकांचा जीवही धोक्यात आला आहे. अशीच एक घटना गुजरातमधील पोरबंदर येथे घडली असून सेल्फी वेडामुळे एका मुलाचे आयुष्यभराचे नुकसान झाले. परीक्षा केंद्रावरच सेल्फी काढल्यामुळे वत्सल करामता या १७ वर्षीय विद्यार्थ्यावर गुजरात बोर्डाने दोन वर्षांची परीक्षा बंदी घातली असून राज्यातील ही पहिलीच घटना आहे.

मार्च महिन्यात झालेल्या परीक्षेदरम्यान वत्सलने परीक्षा केंद्रावर जाऊन सेल्फी काढला. मात्र तेथील सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आणि गुजरात बोर्डाने नापास करत दोन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

२०१४ सालापासून गुजरात बोर्डाने सर्व समिती, तेथील शिक्षण अधिकाऱ्यांना त्यांच्या भागातील परीक्षा केंद्राचे फूटेज चेक करणे बंधनकारक केले आहे. त्याअंतर्गत पोरबंदर येथील परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्ही फूटेज चेक करण्यात आले असता वत्सलने नियमभंग करून परीक्षेपूर्वी सेल्फी काढल्याचे आढळले, मात्र तो कॉपी करत नव्हता हेही त्यामध्ये दिसले. मात्र बोर्डाने त्याच्यावर कारवाई करत दोन वर्षांची बंदी घातली.

'मला परीक्षा केंद्रातील सेल्फी फेसबूकवर अपलोड करायचा होता, म्हणूनच हा फोटो काढला' असे वत्सलने कबूल केले. मात्र अद्याप तो फोटो अपलोड केलेला नसल्याचेही त्याने नमूद केले. पण त्याच्या या कृतीमुळे बोर्डाने त्याच्यावर बंदी घातली आणि सेल्फीच्या वेडापायी त्याच्या शैक्षणिक अभ्यासक्रमातील दोन वर्षांचे नुकसान झाले.

सीसीटीव्ही वा टॅब्लेटच्या सहाय्याने ६० हजार परीक्षा केंद्रांवरील प्रक्रिया रेकॉर्ड करणे गुजरात बोर्डाने बंधनकारक केले आहे. यावर्षी १२ वीच्या ८५० तर १० वीतील १,१५० विद्यार्थ्यांनी नियमभंग केल्याचेही समोर आले आहे.
लेखकाबद्दल
Bharat Yagnik
Bharat Yagnik is special correspondent at The Times of India, Ahmedabad, and reports on education-related issues, including primary school and higher and technical education. His interest areas include travelling and has recently been to Mansarovar.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज