अ‍ॅपशहर

बससाठी थांबणं जीवावर बेतलं, लग्नावरून परताना एकाच कुटुंबातील ५ जणांचा जागीच मृत्यू

बसची वाट पाहणाऱ्या कुटुंबाला कारने चिरडल्याने पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. सगळ्यात विशेष म्हणजे यातील एकजण लांब बसल्यामुळे त्यांचा जीव बचावला आहे.

Authored byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 May 2022, 5:39 pm
ग्वाल्हेर : देशात अपघातांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आताही ग्वाल्हेरमधून अपघाताची मोठी घटना समोर येत आहे. इथे एका भीषण घटनेमध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. सगळ्यात भयंकर म्हणजे हे पाचही जण एकाच कुटुंबातील असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम accident news


मिळालेल्या माहितीनुसार, लग्नसमारंभातून परत येत असताना कुटुंबाला एका कारने चिरडलं. ग्वाल्हेर जिल्ह्यातील उंटिला पोलीस स्टेशन परिसरात गुरुवारी दुपारी एका कारने नियंत्रण सुटल्याने कुटुंबाला चिरडलं. या अपघातात दोन महिला, एक पुरुष आणि दोन लहान मुलांसह एकूण ५ जणांचा मृत्यू झाला आहे.

Monsoon News 2022: पुढच्या ४८ तासांत केरळमध्ये मान्सून? वाचा हवामानाचे ताजे अपडेट्स
हे कुटुंब ग्वाल्हेरच्या सिरोली गावात आयोजित विवाह सोहळ्यासाठी गेले होते. तिथून ते मुरैना इथं परतत होते. यावेळी रस्त्याच्या कडेला बसची वाट पाहत उभ्या असलेल्या या कुटुंबाला कारने चिरडले. अपघातानंतर संतप्त लोकांनी घटनास्थळी रस्ता रोको केला. तर पोलीस आणि प्रशासनाने एफआयआर नोंदवून आरोपी कार चालकाचा शोध सुरू केला आहे.

बसची वाट पाहत उभे होते कुटुंब

मुरैना जिल्ह्यातील डुंगरपूर किरार इथं राहणारे महेंद्र जाटव कुटुंबातील पाच सदस्यांसह ग्वाल्हेर जिल्ह्यातील सिरोली गावात एका नातेवाईकाच्या घरी लग्नासाठी आले होते. बुधवारी रात्री विवाह कार्यक्रमात संपूर्ण कुटुंब आनंदाने सहभागी झाले. गुरुवारी दुपारी महेंद्र हे कुटुंबासह मुरैना इथे जाण्यासाठी रस्त्याच्या कडेला बसची वाट पाहत होते. त्याचवेळी भरधाव वेगाने येणाऱ्या कारने महेंद्र यांच्या कुटुंबीयांना चिरडले.

हनिमूनला गेलेल्या नववधूसमोर आले पतीचे धक्कादायक सत्य; पोलिसात केली तक्रार
या अपघातात महेंद्र यांचे काका पप्पू जाटव (५०), त्यांची पत्नी राजाबेटी आणि दोन मुली पूनम, रेश्मा आणि महिला नातेवाईक जागीच ठार झाले. तर दूरवर बसल्यामुळे महेंद्र यांचा जीव वाचला.

महाराष्ट्रात प्राचीन तलावाच्या खोदकामात सापडले दुर्मिळ पंचमुखी शिवलिंग, पाहा PHOTOS
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज