लंडन : भारताला सहकार्य करण्याची पाकिस्तानची खरेचच इच्छा असेल, तर पाकिस्तानच्या आश्रयाला असलेल्या दहशतवाद्यांना भारताच्या हाती सोपवा, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी शुक्रवारी पाकिस्तानला ठणकावले. जयशंकर यांनी 'ल माँद' या फ्रेंच वृत्तपत्राला विस्तृत मुलाखत दिली असून, या मुलाखतीत 'भारतात दहशतवादी पाठविल्याचे आरोप पाकिस्तानने कधीही नाकारलेले नाहीत,' असे म्हटले आहे. 'पाकिस्तानने दहशतवादी उद्योगच उभारला आहे आणि ते हल्ले करण्यासाठी दहशतवाद्यांना भारतात पाठवतात, त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून उभय देशांचे संबंध अवघड स्थितीत येऊन पोहोचले आहेत,' असे ते म्हणाले.
दहशतवाद्यांना भारताकडे सोपवा : जयशंकर
भारताला सहकार्य करण्याची पाकिस्तानची खरेचच इच्छा असेल, तर पाकिस्तानच्या आश्रयाला असलेल्या दहशतवाद्यांना भारताच्या हाती सोपवा, असे परराष्ट्र मंत्री ...
महाराष्ट्र टाइम्स 16 Nov 2019, 5:12 am