वृत्तसंस्था, नवी दिल्ली
गुजरातचे माजी गृहमंत्री हरेन पंड्या यांच्या हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवून १२ आरोपींना दोषी ठरवले आहे. २६ मार्च २००३ रोजी पंड्या यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. न्या. अरुण मिश्रा यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.
सत्र न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवून पाच वर्षांपासून जन्मठेपेपर्यंतची शिक्षा सुनावली होती. या निकालाविरोधात आरोपींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर गुजरात उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निकाल बदलून २९ ऑगस्ट २०११ रोजी सर्व आरोपींना दोषमुक्त केले होते. या निकालाविरोधात गुजरात सरकार आणि 'सीबीआय'ने २०१२ मध्ये सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.
शुक्रवारी या खटल्याचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने 'सीपीआयएल' या स्वयंसेवी संस्थेची याचिका फेटाळून लावली. न्यायालयाच्या निरीक्षणाखाली या खटल्याचा नव्याने तपास करण्यात यावा, अशी विनंती या याचिकेद्वारे करण्यात आली होती. ही याचिका फेटाळून न्यायालयाने या संस्थेवर ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला; तसेच या प्रकरणी आता कोणत्याही याचिकेचा विचार केला जाणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
---
गुजरातचे माजी गृहमंत्री हरेन पंड्या यांच्या हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवून १२ आरोपींना दोषी ठरवले आहे. २६ मार्च २००३ रोजी पंड्या यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. न्या. अरुण मिश्रा यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.
सत्र न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवून पाच वर्षांपासून जन्मठेपेपर्यंतची शिक्षा सुनावली होती. या निकालाविरोधात आरोपींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर गुजरात उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निकाल बदलून २९ ऑगस्ट २०११ रोजी सर्व आरोपींना दोषमुक्त केले होते. या निकालाविरोधात गुजरात सरकार आणि 'सीबीआय'ने २०१२ मध्ये सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.
शुक्रवारी या खटल्याचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने 'सीपीआयएल' या स्वयंसेवी संस्थेची याचिका फेटाळून लावली. न्यायालयाच्या निरीक्षणाखाली या खटल्याचा नव्याने तपास करण्यात यावा, अशी विनंती या याचिकेद्वारे करण्यात आली होती. ही याचिका फेटाळून न्यायालयाने या संस्थेवर ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला; तसेच या प्रकरणी आता कोणत्याही याचिकेचा विचार केला जाणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
---