अ‍ॅपशहर

सोशल मीडियावर व्यक्त होत असाल तर सावधान!

आजकाल सोशल मीडियावर अनेकजण सर्रास आपली मतं मांडतना दिसतात. काही मंडळींना टार्गेट करून 'ट्रोल'ही केले जाते. अनेक फोटोंना अश्लील कमेंट्सचा सामनाही करावा लागतो... परंतु, सोशल मीडियावर अशा पद्धतीने रिअॅक्ट होणाऱ्यांनो सावधान! कारण, आता सोशल मीडियातील मजकुरावर सरकार करडी नजर ठेवणार आहे. सोशल मीडियावर तुम्ही लिहिलेल्या मजकुरामुळं एखाद्याच्या भावना दुखावल्या किंवा अफवांमुळं दंगलसदृश वातावरण निर्माण होण्याची शक्यता वाटली तर तुम्हाला ३ वर्षांपर्यंत कैद होऊ शकते.

Maharashtra Times 15 Oct 2017, 12:49 pm
मटा ऑनलाइन वृत्त | नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hate comment will bring you to jail govt considering to monitor social media
सोशल मीडियावर व्यक्त होत असाल तर सावधान!


आजकाल सोशल मीडियावर अनेकजण सर्रास आपली मतं मांडतना दिसतात. काही मंडळींना टार्गेट करून 'ट्रोल'ही केले जाते. अनेक फोटोंना अश्लील कमेंट्सचा सामनाही करावा लागतो... परंतु, सोशल मीडियावर अशा पद्धतीने रिअॅक्ट होणाऱ्यांनो सावधान! कारण, आता सोशल मीडियातील मजकुरावर सरकार करडी नजर ठेवणार आहे.

सोशल मीडियावर तुम्ही लिहिलेल्या मजकुरामुळं एखाद्याच्या भावना दुखावल्या किंवा अफवांमुळं दंगलसदृश वातावरण निर्माण होण्याची शक्यता वाटली तर तुम्हाला ३ वर्षांपर्यंत कैद होऊ शकते. तसंच, अशा आशयाचा कोणताही मजकूर शेअर, फॉरवर्ड किंवा रिट्विट केला तर अशा व्यक्तीलाही हीच शिक्षा होऊ शकते.

सोशल मीडियावर वाढत असलेल्या आक्षेपार्ह मजकुराची दखल घेऊन केंद्र सरकारने हा निर्णय घेतालाय. यासाठी स्वतंत्र कायदा करण्याऐवजी सध्या अस्तिवात असलेल्या कायद्यात आणि २००० सालच्या आयटी कायद्यात काही सुधारणा करण्यात येणार आहेत. १० तज्ज्ञांच्या मंडळानं या सुधारणांचा मसुदा सरकारकडं सुपूर्द केलायं. या कामासाठी पोलिसांचे विशेष सायबर कक्ष स्थापन करण्याची शिफारस करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सरकारलाही या सुधारणा मान्य असून लवकरच केंद्राकडून हिरवा कंदील दाखवण्यात येईल.

काय होणार बदल?

>> ऑनलाइन अफवा पसरविणाऱ्या मजकुरावर कारवाई होणार
>> जात, धर्म, भाषा, लिंग यापैकी कोणत्याही मुद्द्याच्या आधारावर धमकी किंवा गैरसमज पसरविणाऱ्याला ३ वर्षांची कैद
>> हिंसेचा पुरस्कार करणे किंवा त्यास चिथावणी देणाऱ्या व्यक्तीला एका वर्षाची कैद आणि ५ हजार रुपये दंड

पोलीस सायबर सेल

>> प्रत्येक राज्यातील पोलीस महानिरीक्षक स्तरावरील एक अधिकारी या सायबर पोलीस टीमचा प्रमुख असेल

>> सायबर सेलवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी त्या पोलीस महानिरीक्षकवर असेल.

>> पोलीस उपनिरीक्षक पदाच्या स्तरावरील एक अधिकारी प्रत्येक जिल्ह्यातील कारवाईवर लक्ष ठेवेल.

>> जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात एक सायबर पोलीस टीम असेल.

>> आपली तक्रार आपण या टीमकडे नोंदवू शकता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज