अ‍ॅपशहर

'हाथरससारख्या घटनांनी तळपायाची आग मस्तकात जाते, माझीही मुलगी १८ वर्षांची आहे'

युपीतील हाथरस सामूहिक बालत्कार प्रकरणातील पीडित तरुणीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर उत्तर प्रदेश सरकारविरोधात रोष उफाळून आला आहे. काँग्रेससह विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. आता काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Oct 2020, 5:22 pm
नवी दिल्लीः उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर देशभरात संताप आहे. यूपी सरकारला कॉंग्रेसकडून सतत लक्ष्य केलं जात आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा गुरुवारी हाथरसकडे रवाना झाले. यावेळी हाथरस घटनेबद्दल प्रियंका गांधी वड्रा यांनी यूपी सरकारवर निशाणा साधला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम priyanka gandhi - yogi adityanath
'हाथरससारख्या घटनांमुळे तळपायाची आग मस्तकात जाते, माझीही मुलगी १८ वर्षांची आहे'


हे डीएनडी मार्गे ताज एक्स्प्रेस वे वरून हाथरसकडे रवाना झाले. पण त्यांचा ताफा ग्रेटर नोएडाजवळ पोलिसांनी रोखला. या दरम्यान प्रियांका गांधी यांना यूपी सरकारवर जोरदार टीका केली.

हाथरससारख्या घटनांनी संताप होतो. माझी मुलगीही १८ वर्षांची आहे. प्रत्येक स्त्रीला संताप आला पाहिजे. अंत्यसंस्कार कुटुंबाशिवाय करणं हे आपल्या हिंदू धर्मात कुठे लिहिलं आहे, असं म्हणत प्रियांका गाधी वाड्रा यांनी युपीतील भाजप सरकरा आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कारभारावर जोरदार टीका केली.

राज्याच्या सुरक्षेची जबाबदारी मुख्यमंत्रीच असते. तरीही रोज राज्यात बलात्काराच्या घटना घडत आहेत. राज्य सरकारकडून या प्रकरणांमध्ये कोणतीही कठोर कारवाई केली जात नाहीए. तुम्ही स्वतःला हिंदू धर्माचे रक्षक समजतात. पण तुमच्या राज्यात वडिलांना आपल्या मुलीच्या अंत्यसंस्कारासाठी रोखलं जातंय, असं म्हणत प्रियांका गांधींनी योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला.

राहुल- प्रियांकांचा हल्लाबोल

काँग्रेस नेते राहुल गांधीही प्रियांकाचा गांधी सोबत आहेत. पोलिसांनी त्यांना रोखल्याने दोन्ही नेते पायी चालत निघाले. पण पुढे जाऊन पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. गुरुवारी दुपारी हजारो कॉंग्रेस कार्यकर्ते डीएनडी ओलांडून यूपीमध्ये दाखल झाले. पण नंतर सर्व ताफे रोखण्यात आले.

राहुल-प्रियांकांना रोखलं, १४० किलोमीटर चालत निघाले

राहुल गांधींना पोलिसांची धक्काबुक्की; जमिनीवर कोसळले, धरले धरणे

राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे हाथरसमध्ये पोहोचण्यापूर्वीच जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. यासह कलम जमाव बंदी लागू करण्यात आली आहे. हाथरसच्या सीमेवर समाजवादी पार्टीकडून निदर्शन करण्यात येत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज