अ‍ॅपशहर

राज्यात उष्माघाताचे पाच बळी

देशातील विविध राज्यांमध्ये यंदा मार्च महिन्यातच उष्णतेची लाट आली असून रेकॉर्डब्रेक ४६.५ इतक्या तापमानाची नोंद झालेल्या महाराष्ट्रात उष्माघाताने आतापर्यंत ५ जणांचा बळी गेला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सोमवारपर्यंत तीन राज्यांमध्येच उष्णतेची लाट होती मात्र आता ९ राज्यांना या लाटेने व्यापले आहे.

Maharashtra Times 30 Mar 2017, 8:23 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम heat wave strikes in 9 indian states mercury over 40 degrees in march
राज्यात उष्माघाताचे पाच बळी


देशातील विविध राज्यांमध्ये यंदा मार्च महिन्यातच उष्णतेची लाट आली असून रेकॉर्डब्रेक ४६.५ इतक्या तापमानाची नोंद झालेल्या महाराष्ट्रात उष्माघाताने आतापर्यंत ५ जणांचा बळी गेला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सोमवारपर्यंत तीन राज्यांमध्येच उष्णतेची लाट होती मात्र आता ९ राज्यांना या लाटेने व्यापले आहे. महाराष्ट्र, गुजरात, हरयाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा या राज्यामध्ये तापमानात मोठी वाढ झाली आहे. पुढचे दोन महिने देशभरात सरासरीपेक्षा जास्त तापमान राहणार आहे, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला आहे.

महाराष्ट्रातातील नागपूर भागात १ एप्रिलपर्यंत तापमान ४४ अंश सेल्सियसपर्यंत जाईल असा अंदाज आहे. सध्या नागपुरात पारा ४२ अंशापर्यंत पोहोचला आहे. गुजरात, मध्य प्रदेशमध्येही तापमान ४० अंश सेल्सियसच्यावर राहणार आहे.

दरम्यान, रायगड जिल्ह्यातील कोलाडजवळच्या भीरा गावात मंगळवारी ४६.५ अंश सेल्सियस इतकं विक्रमी तापमान नोंदवलं गेलं होते. त्यादिवशीचं जगातील दुसऱ्या क्रमांकाचं ते तापमान होतं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज