आझमगड: उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) आझमगड जिल्ह्यातील तारवण भागात एका ग्रामप्रमुखाला गोळ्या झाडून ठार मारण्यात आले. या हत्येचा निषेध नोंदविणाऱ्या ग्रामस्थांनी संतप्त होत बागरिया पोलिस चौकीच पेटवून दिली. यावेळी जिल्ह्यातील पोलिस अधीक्षकांसह पोलिस ठाण्यातील पोलिसही घटनास्थळी उपस्थित होते. पोलिस चौकीला आग लावण्यापूर्वी या संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांवर दगडफेकही केली (Heavy violence in azamgarh). या काळात पोलिस आणि लोकांच्या चेंगराचेंगरीत एका मुलाचा मृत्यूही झाला आहे.
आझमगड जिल्ह्यातील गेल्या २४ तासातील ही तिसरी हत्या असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यातील तारवण पोलिस स्टेशन परिसरातील बांसगाव गावचे प्रमुख सत्यमेव जयते उर्फ पप्पू राम यांना शुक्रवारी सायंकाळी गोळ्या झाडून ठार मारण्यात आले. हे मारेकरी दुचाकीवर ग्राम प्रधानाच्या घरी पोहोचले आणि त्यांना बाहेर बोलावून ४२ वर्षीय प्रधानाला गोळी मारली.
एसपी-डीएम आल्यानंतर तणाव निवळला
संतप्त झालेल्या ग्रामस्थांच्या या भीषण हल्ल्यात शहर पोलिस अधीक्षकांच्या वाहनासहीत एकूण पाच वाहने जाळली गेली. या संतप्त ग्रामस्थांनी आक्रमक होत ५ दुचाकींसह बागरिया पोलिस स्टेशनलाच आग लावली. या संतप्त जमावाला आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांसह अनेक पोलिस ठाण्यांचे पोलिस आणि फौजफाटा घटनास्थळी दाखल झाल्यानंतर या परिसरातील परिस्थिती आटोक्यात येत शांतता प्रस्थापित झाली. आझमगड जिल्ह्यातील चोवीस तासांतील ही तिसरी हत्या आहे.
वाचा ही बातमी: शहीद मोहनचंद शर्मा बनले देशात सर्वाधिक शौर्य पदके प्राप्त करणारे अधिकारी
या घटनेने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी परिसरात हिंसाचार पसरवला. आक्रमत होत ग्रामस्थांनी अनेक वाहने आणि पोलिस चौकी पेटवून दिली. घटनास्थळी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह अनेक पोलिस अधिकारी दाखल झाले आहेत. तसेच परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सध्या घटनास्थळी शांतता असून संपूर्ण क्षेत्रात पीएसी जवान तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक त्रिवेणी सिंह यांनी दिली.
ही बातमी वाचा- लडाख: 'त्या वेळी' भारतीय जवान चीनी सैनिकांशी १७ ते २० तास लढत होते
ही बातमी देखील वाचा- केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा करोना रिपोर्ट निगेटीव्ह, काही दिवस होम आयसोलेशनमध्ये राहणार
आझमगड जिल्ह्यातील गेल्या २४ तासातील ही तिसरी हत्या असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यातील तारवण पोलिस स्टेशन परिसरातील बांसगाव गावचे प्रमुख सत्यमेव जयते उर्फ पप्पू राम यांना शुक्रवारी सायंकाळी गोळ्या झाडून ठार मारण्यात आले. हे मारेकरी दुचाकीवर ग्राम प्रधानाच्या घरी पोहोचले आणि त्यांना बाहेर बोलावून ४२ वर्षीय प्रधानाला गोळी मारली.
एसपी-डीएम आल्यानंतर तणाव निवळला
संतप्त झालेल्या ग्रामस्थांच्या या भीषण हल्ल्यात शहर पोलिस अधीक्षकांच्या वाहनासहीत एकूण पाच वाहने जाळली गेली. या संतप्त ग्रामस्थांनी आक्रमक होत ५ दुचाकींसह बागरिया पोलिस स्टेशनलाच आग लावली. या संतप्त जमावाला आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांसह अनेक पोलिस ठाण्यांचे पोलिस आणि फौजफाटा घटनास्थळी दाखल झाल्यानंतर या परिसरातील परिस्थिती आटोक्यात येत शांतता प्रस्थापित झाली. आझमगड जिल्ह्यातील चोवीस तासांतील ही तिसरी हत्या आहे.
वाचा ही बातमी: शहीद मोहनचंद शर्मा बनले देशात सर्वाधिक शौर्य पदके प्राप्त करणारे अधिकारी
या घटनेने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी परिसरात हिंसाचार पसरवला. आक्रमत होत ग्रामस्थांनी अनेक वाहने आणि पोलिस चौकी पेटवून दिली. घटनास्थळी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह अनेक पोलिस अधिकारी दाखल झाले आहेत. तसेच परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सध्या घटनास्थळी शांतता असून संपूर्ण क्षेत्रात पीएसी जवान तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक त्रिवेणी सिंह यांनी दिली.
ही बातमी वाचा- लडाख: 'त्या वेळी' भारतीय जवान चीनी सैनिकांशी १७ ते २० तास लढत होते
ही बातमी देखील वाचा- केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा करोना रिपोर्ट निगेटीव्ह, काही दिवस होम आयसोलेशनमध्ये राहणार