अ‍ॅपशहर

प्रवाशांनो, आता रेल्वे प्रवास महागणार

नोटाबंदी नंतर मेटाकुटीला आलेल्या नागरिकांच्या खिशाला आता आणखी झळ बसणार आहे. पायाभूत सुविधा निर्माण करायच्या असल्याने तिकीट दरवाढ करण्याच्या हालचाली रेल्वे प्रशासनाने सुरू केल्या आहेत. त्यामुळे येत्या नव्या वर्षात प्रवाशांना तिकीट दरवाढीचा सामना करावा लागणार आहे.

Maharashtra Times 11 Dec 2016, 3:00 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hike in fares likely as railway mulls ways to raise resources
प्रवाशांनो, आता रेल्वे प्रवास महागणार


नोटाबंदी नंतर मेटाकुटीला आलेल्या नागरिकांच्या खिशाला आता आणखी झळ बसणार आहे. पायाभूत सुविधा निर्माण करायच्या असल्याने तिकीट दरवाढ करण्याच्या हालचाली रेल्वे प्रशासनाने सुरू केल्या आहेत.

रेल्वेने यापुर्वी केंद्रीय अर्थ मंत्रालयाला विशेष सुरक्षा निधीचा प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाने फेटाळला होता. ट्रॅकची दुरुस्ती करणे, सिग्नल प्रणाली सुधारणे आणि मानवरहित लेवल क्रॉसिंग संपुष्टात आणण्याबरोबरच सुरक्षेसाठी निधी जमविण्याकरीता सुरक्षा उपकर लावण्याची मागणी या प्रस्तावात करण्यात आली होती.

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी अर्थमंत्री अरूण जेटली यांना एक पत्र लिहुन राष्ट्रीय रेल्वे सुरक्षा निधी निर्माण करण्यासाठी १ कोटी १९ हजार १८३ रूपयांच्या निधीची तरतूद करण्याची मागणी केली होती. अर्थमंत्रालयाने ही मागणी फेटाळून लावली. केवळ २५ टक्केच निधी देण्यात येईल. बाकी निधी तिकीट दर वाढवून निर्माण करण्याचा सल्ला अर्थमंत्रालयाने प्रभू यांना दिला होता. दरम्यान तिकीट दर वाढ करण्याची रेल्वेची इच्छा नाही. कारण आधीच प्रवासी बुकींग घटत आहे. तसेच एसी-२ आणि एसी-१ चे भाडेही अव्वाच्या सव्वा आहे. पण अर्थमंत्रालयाने पॅकेज देण्यास नकार दिल्याने तिकीट दरवाढ करण्याशिवाय रेल्वेकडे पर्याय उरलेला नसल्याने नव्या वर्षात या तिकीट दरवाढीला प्रवाशांना सामोरे जावे लागणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज