वृत्तसंस्था, शिमला
हिमाचल प्रदेशातील काँग्रेसच्या आमदार आशा कुमारी (वय ५७) यांनी महिला पोलिस हवालदाराच्या श्रीमुखात भडकावली. उत्तरादाखल त्या महिला पोलिसानेही आशा कुमारी यांना श्रीमुखात लगाविली. हा प्रकार शिमला येथे काँग्रेस मुख्यालयाबाहेर शुक्रवारी घडला.
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी येथील काँग्रेस मुख्यालयात आढावा बैठक आयोजित केली होती. त्याला उपस्थित राहण्यासाठी आशा कुमारी संबंधित इमारतीत प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करीत होत्या. त्या वेळी गेटजवळ गर्दी उसळली होती. महिला पोलिसाने अडविल्यानंतर संतप्त झालेल्या आशा कुमारी यांनी तिच्या थोबाडीत मारली. त्या वेळी क्षणाचाही विलंब न लावता त्या पोलिसानेही आशा कुमारी यांनी थोबाडीत मारली. हा सर्व प्रकार घडला तेव्हा राहुल गांधी मुख्यालयात बैठक घेत होते.
कुमारी यांनी झाल्या प्रकाराची नंतर माफी मागितली. ‘त्या महिला हवालदाराने मला अपशब्द वापरले, धक्काबुक्की केली, तिने संयम राखायला हवा होता. मी तिच्या आईच्या वयाची आहे. मीसुद्धा एवढे संतप्त व्हायला नको होते, त्याबद्दल मी खेद व्यक्त करते’, असे त्या म्हणाल्या. राहुल गांधी यांनी या घटनेचा निषेध केला आहे.
आमदार आशा कुमारी या माजी मुख्यमंत्री वीरभद्रसिंह यांच्या पुतणी आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपली जागा राखून विजय मिळवला आहे.
हिमाचल प्रदेशातील काँग्रेसच्या आमदार आशा कुमारी (वय ५७) यांनी महिला पोलिस हवालदाराच्या श्रीमुखात भडकावली. उत्तरादाखल त्या महिला पोलिसानेही आशा कुमारी यांना श्रीमुखात लगाविली. हा प्रकार शिमला येथे काँग्रेस मुख्यालयाबाहेर शुक्रवारी घडला.
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी येथील काँग्रेस मुख्यालयात आढावा बैठक आयोजित केली होती. त्याला उपस्थित राहण्यासाठी आशा कुमारी संबंधित इमारतीत प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करीत होत्या. त्या वेळी गेटजवळ गर्दी उसळली होती. महिला पोलिसाने अडविल्यानंतर संतप्त झालेल्या आशा कुमारी यांनी तिच्या थोबाडीत मारली. त्या वेळी क्षणाचाही विलंब न लावता त्या पोलिसानेही आशा कुमारी यांनी थोबाडीत मारली. हा सर्व प्रकार घडला तेव्हा राहुल गांधी मुख्यालयात बैठक घेत होते.
कुमारी यांनी झाल्या प्रकाराची नंतर माफी मागितली. ‘त्या महिला हवालदाराने मला अपशब्द वापरले, धक्काबुक्की केली, तिने संयम राखायला हवा होता. मी तिच्या आईच्या वयाची आहे. मीसुद्धा एवढे संतप्त व्हायला नको होते, त्याबद्दल मी खेद व्यक्त करते’, असे त्या म्हणाल्या. राहुल गांधी यांनी या घटनेचा निषेध केला आहे.
आमदार आशा कुमारी या माजी मुख्यमंत्री वीरभद्रसिंह यांच्या पुतणी आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपली जागा राखून विजय मिळवला आहे.