अ‍ॅपशहर

मंत्रिमंडळाची बैठक संपली, काश्मीरबाबत निर्णयाची शक्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी सुरू असलेली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली आहे. त्यात काश्मीरसंदर्भात ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Aug 2019, 10:56 am
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी सुरू असलेली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली आहे. त्यात काश्मीरसंदर्भात ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. आता संसदेत कोणती घोषणा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अधिवेशनाचे कामकाज सुरू झाल्यानंतर केंद्र सरकार काश्मीरबाबत निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम modi cabinet


काश्मीरबाबत देशभरात संभ्रमावस्था आहे. देशातील शांतता आणि सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी सर्व राज्यांसाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. त्यामुळे काश्मीरसंदर्भात मोठा निर्णय होण्याची दाट शक्यता असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे मंत्रिमंडळाची बैठक संपली असून, त्यात काश्मीरबाबत ऐतिहासिक निर्णय घेतला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता संसदेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर सरकार काश्मीरसंबंधी मोठी घोषणा करू शकतं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लोकसभा आणि राज्यसभेत काश्मीरसंबंधी सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती देऊ शकतात. सरकारच्या निर्णयानंतर दोन्ही सभागृहात गदारोळाची शक्यता आहे. काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष काश्मीरमधील सद्यपरिस्थितीवर नाराजी व्यक्त करत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज