अ‍ॅपशहर

बुरहानचा बदला म्हणून तीन जवानांना मारलं!

बुरहान वानीला श्रद्धांजली म्हणूनच बीसएफच्या तीन जवानांना मारल्याची दर्पोक्ती हिजबुल मुजाहिदीननं केली आहे. सोमवारी काही दहशतवाद्यांनी कुपवाडा जिल्ह्यात बीएसएफच्या चौकीवर हल्ला केला होता. त्यात तीन जवान शहीद झाले होते.

Maharashtra Times 9 Aug 2016, 2:27 pm
मटा ऑनलाइन वृत्त । श्रीनगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hizbul kills 3 bsf jawans to avenge wanis death
बुरहानचा बदला म्हणून तीन जवानांना मारलं!


बुरहान वानीला श्रद्धांजली म्हणूनच बीसएफच्या तीन जवानांना मारल्याची दर्पोक्ती हिजबुल मुजाहिदीननं केली आहे. सोमवारी काही दहशतवाद्यांनी कुपवाडा जिल्ह्यात बीएसएफच्या चौकीवर हल्ला केला होता. त्यात तीन जवान शहीद झाले होते. त्यानंतर, हा बुरहानचा ‘बदला’ असल्याचं पत्रक ‘हिजबुल’नं प्रसिद्ध केलंय.

गेल्या महिन्यात भारतीय जवानांशी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वानी ठार झाला होता. त्याला ‘शहीद’ ठरवून दहशतवाद्यांनी फुटीरताद्यांसोबत काश्मीर अक्षरशः पेटवलं होतं. अजूनही ही आग धुमसत असतानाच, काल हिजबुलच्या दहशतवाद्यांनी माछिल सेक्टरमध्ये बीएसएफ चौकीवर हल्ला केला. त्यात एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलं, पण तीन जवान शहीद झाले आणि काही जखमी झाले. हा हल्ला आपणच केला असून बुरहानला श्रद्धांजली म्हणून जवानांना मारल्याचं हिजबुलचा प्रवक्ता बुरहान-उद-दीन याने जाहीर केलं. त्यामुळे आता भारतीय लष्कर त्यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देणार का, हे पाहावं लागेल.

दरम्यान, काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, यादृष्टीने चर्चा सुरू करण्याचं आवाहन जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केलं आहे. काश्मीरमधील परिस्थिती अद्याप निवळली नसून अनेक भागांत अजूनही संचारबंदी कायम आहे. फुटीरतावाद्यांनी १२ ऑगस्टपर्यंत बंद पुकारून वातावरण आणखी तापवण्याचा प्रयत्न केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज