नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्यानंतरच पोलिसांनी जेएनयूचा विद्यार्थी नेता शरजील इमामविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे, असा गौप्यस्फोट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला. दिल्लीतील रिठाला येथे एका निवडणूक प्रचार रॅलीला संबोधित करताना शहा यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.
शरजील इमामचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात त्याने पूर्वोत्तर राज्यांना भारतापासून वेगळं करण्याची चिथावणी दिली आहे. त्याने देशाचे तुकडे करण्यावर जोर दिला होता. त्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दखल घेतली. मोदींनीच पोलिसांना शरजीलविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला सांगितलं. त्यामुळे पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे, असं अमित शहा यांनी सांगितलं.
जेएनयू: विद्यार्थी नेता शरजील विरोधात देशद्रोहाचा गुन्हा
मोदी सरकारमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही आहे. तुम्हाला शिव्या द्यायच्याच असेल तर आम्हाला द्या. आमच्या पक्षाला द्या. मात्र कुणी भारताचे तुकडे करण्याची भाषा केली तर त्याला गजाआड जावेच लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
भारतात मुस्लिमांचा कधीच छळ झाला नाही: संघ
काही दिवसांपूर्वी जेएनयूमध्ये भारत तेरे टूकडे हो हजार अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. मोदींनी देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना तुरुंगात टाकले. मात्र हे काही लोक अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा पुढे रेटत आहेत, असं शहा म्हणाले. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशात धर्माच्या आधारे छळवणूक झालेल्यांना नागरिकत्व देण्यासाठी मोदींनी सीएए कायदा आणला. त्यावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणतात भाजपला पाकिस्तानी नागरिकांची चिंता आहे. जेव्हापासून फाळणी झाली, तेव्हापासून लाखो शरणार्थी दिल्लीत आले. हे आपलेच लोक आहेत. आपलेच भावंडं आहेत. तुम्ही त्यांना पाकिस्तानी म्हणता? असं म्हणताना काहीच कसं वाटत नाही?, असा सवालही शहा यांनी केला. यावेळी शहा यांनी केजरीवाल सरकारच्या कामाचाही पंचनामा केला. केजरीवाल सातत्याने खोटं बोलून दिल्लीतील जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
काय आहे १२४ ए कलम
देशाची एकता आणि अखंडतेला बाधा येईल असं कृत्य वा विधान केल्याबद्दल हा भादंवि कलम १२४ए अन्वये देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जातो. सरकारविरोधी साहित्याचं लिखाण, त्याचं समर्थन करणे, राष्ट्रीय प्रतिकांचा अपमान करण्याबरोबरच संविधानाला कमी लेखन, लिखित वा मौखिकतेद्वारे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे लोकांमध्ये द्वेष निर्माण करणे किंवा असंतोष निर्माण केल्यास या कलमाखाली गुन्हा दाखल केला जातो. देशद्रोहाच्या गुन्ह्यात एखादा व्यक्ती दोषी आढळल्यास त्याला तीन वर्षांपासून ते अजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली जाते.
प्रजासत्ताक दिन: राजपथावर नेत्रदीपक संचलन
शरजील इमामचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात त्याने पूर्वोत्तर राज्यांना भारतापासून वेगळं करण्याची चिथावणी दिली आहे. त्याने देशाचे तुकडे करण्यावर जोर दिला होता. त्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दखल घेतली. मोदींनीच पोलिसांना शरजीलविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला सांगितलं. त्यामुळे पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे, असं अमित शहा यांनी सांगितलं.
जेएनयू: विद्यार्थी नेता शरजील विरोधात देशद्रोहाचा गुन्हा
मोदी सरकारमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही आहे. तुम्हाला शिव्या द्यायच्याच असेल तर आम्हाला द्या. आमच्या पक्षाला द्या. मात्र कुणी भारताचे तुकडे करण्याची भाषा केली तर त्याला गजाआड जावेच लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
भारतात मुस्लिमांचा कधीच छळ झाला नाही: संघ
काही दिवसांपूर्वी जेएनयूमध्ये भारत तेरे टूकडे हो हजार अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. मोदींनी देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना तुरुंगात टाकले. मात्र हे काही लोक अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा पुढे रेटत आहेत, असं शहा म्हणाले. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशात धर्माच्या आधारे छळवणूक झालेल्यांना नागरिकत्व देण्यासाठी मोदींनी सीएए कायदा आणला. त्यावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणतात भाजपला पाकिस्तानी नागरिकांची चिंता आहे. जेव्हापासून फाळणी झाली, तेव्हापासून लाखो शरणार्थी दिल्लीत आले. हे आपलेच लोक आहेत. आपलेच भावंडं आहेत. तुम्ही त्यांना पाकिस्तानी म्हणता? असं म्हणताना काहीच कसं वाटत नाही?, असा सवालही शहा यांनी केला. यावेळी शहा यांनी केजरीवाल सरकारच्या कामाचाही पंचनामा केला. केजरीवाल सातत्याने खोटं बोलून दिल्लीतील जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
काय आहे १२४ ए कलम
देशाची एकता आणि अखंडतेला बाधा येईल असं कृत्य वा विधान केल्याबद्दल हा भादंवि कलम १२४ए अन्वये देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जातो. सरकारविरोधी साहित्याचं लिखाण, त्याचं समर्थन करणे, राष्ट्रीय प्रतिकांचा अपमान करण्याबरोबरच संविधानाला कमी लेखन, लिखित वा मौखिकतेद्वारे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे लोकांमध्ये द्वेष निर्माण करणे किंवा असंतोष निर्माण केल्यास या कलमाखाली गुन्हा दाखल केला जातो. देशद्रोहाच्या गुन्ह्यात एखादा व्यक्ती दोषी आढळल्यास त्याला तीन वर्षांपासून ते अजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली जाते.
प्रजासत्ताक दिन: राजपथावर नेत्रदीपक संचलन