नवी दिल्ली: राज्यसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेनेवर थेट शब्दांत हल्ला चढवला. 'सत्तेसाठी लोक कशाप्रकारे रंग बदलतात ते पाहा' असा चिमटा काढत शहा यांनी रातोरात आपली भूमिका बदलणाऱ्या शिवसेनेला फैलावर घेतले.
लोकसभेत नागरिकत्व विधेयकाच्या बाजूने मतदान करणाऱ्या शिवसेनेने राज्यसभेत मात्र या विधेयकावर वेगळी भूमिका घेण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यावर बोलताना अमित शहा यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं. सत्तेसाठी लोक कशाप्रकारे रंग बदलतात ते पाहून मला आश्चर्य वाटतं. सोमवारी लोकसभेत शिवसेनेने नागरिकत्व विधेयकाला पाठिंबा दिला आणि आज मात्र शिवसेनेने वेगळीच भूमिका घेतली आहे. त्यामुळे एका रात्रीत हा बदल कसा झाला याचं उत्तर मलाच नव्हे तर महाराष्ट्राला शिवसेनेने द्यायला हवे, असे आव्हान शहा यांनी दिले.
शिवसेना संविधानाची आठवण ठेवेल: काँग्रेस
दरम्यान, लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा दिल्यानंतर शिवसेनेने मंगळवारी त्यावरून घुमजाव केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या विधेयकावर शिवसेनेची भूमिका नव्याने स्पष्ट केली होती. लोकसभेत या विधेयकावर शिवसेनेने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्या प्रश्नांवर समाधानकारक स्पष्टीकरण व्हायला हवे. तसे झाले नाही तर शिवसेना राज्यसभेत या विधेयकाला पाठिंबा देणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. राज्यसभेत आज विधेयकावरील चर्चेत भाग घेताना शिवसेना सदस्य संजय राऊत यांनीही त्याला अनुसरूनच मुद्दे मांडत भाजपवर निशाणा साधला. देशातील अनेक भागात या विधेयकाला विरोध होत आहे. विरोध करणारेही देशाचे नागरिक आहेत. आमचाही या विधेयकाला विरोध असून आम्हाला कुणाच्या देशभक्तीच्या प्रमाणपत्राची गरज नाही. आम्ही किती कट्टर हिंदू आहोत, याचंही प्रमाणपत्र आम्हाला द्यायची गरज नाही, असं सांगतानाच तुम्ही ज्या शाळेत शिकत आहात. त्या शाळेचे आम्ही हेडमास्तर आहोत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आमचे हेडमास्तर होते. अटलबिहारी वाजपेयी आणि श्यामाप्रसाद मुखर्जीही आमचे हेडमास्तर होते, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवला.
विधेयक म्हणजे काय? त्याचा कायदा कसा बनतो?
...म्हणून शिवसेनेचे घुमजाव?
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून या विधेयकाचे समर्थन करणाऱ्या सर्वच पक्षांना आज लक्ष्य केले होते. ज्यांनी ज्यांनी या विधेयकाचे समर्थन केले ते सगळेच पक्ष देशाच्या मुळावर घाव घालत आहेत, असे राहुल यांनी नमूद केले होते. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या भूमिकेवर तातडीने स्पष्टीकरण दिल्याचे बोलले जात होते. महाराष्ट्रात काँग्रेसने शिवसेनेसोबत आघाडी केली असून शिवसेनेने लोकसभेत घेतलेल्या भूमिकेवर काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनीही आश्चर्य व्यक्त केले होते. शिवसेनेला तटस्थ राहता आले असते असे मतही दलवाई यांनी व्यक्त केले होते.
शिवसेनेसाठी भाजपची दारे सदैव खुली: पाटील
लोकसभेत नागरिकत्व विधेयकाच्या बाजूने मतदान करणाऱ्या शिवसेनेने राज्यसभेत मात्र या विधेयकावर वेगळी भूमिका घेण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यावर बोलताना अमित शहा यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं. सत्तेसाठी लोक कशाप्रकारे रंग बदलतात ते पाहून मला आश्चर्य वाटतं. सोमवारी लोकसभेत शिवसेनेने नागरिकत्व विधेयकाला पाठिंबा दिला आणि आज मात्र शिवसेनेने वेगळीच भूमिका घेतली आहे. त्यामुळे एका रात्रीत हा बदल कसा झाला याचं उत्तर मलाच नव्हे तर महाराष्ट्राला शिवसेनेने द्यायला हवे, असे आव्हान शहा यांनी दिले.
शिवसेना संविधानाची आठवण ठेवेल: काँग्रेस
दरम्यान, लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा दिल्यानंतर शिवसेनेने मंगळवारी त्यावरून घुमजाव केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या विधेयकावर शिवसेनेची भूमिका नव्याने स्पष्ट केली होती. लोकसभेत या विधेयकावर शिवसेनेने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्या प्रश्नांवर समाधानकारक स्पष्टीकरण व्हायला हवे. तसे झाले नाही तर शिवसेना राज्यसभेत या विधेयकाला पाठिंबा देणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. राज्यसभेत आज विधेयकावरील चर्चेत भाग घेताना शिवसेना सदस्य संजय राऊत यांनीही त्याला अनुसरूनच मुद्दे मांडत भाजपवर निशाणा साधला. देशातील अनेक भागात या विधेयकाला विरोध होत आहे. विरोध करणारेही देशाचे नागरिक आहेत. आमचाही या विधेयकाला विरोध असून आम्हाला कुणाच्या देशभक्तीच्या प्रमाणपत्राची गरज नाही. आम्ही किती कट्टर हिंदू आहोत, याचंही प्रमाणपत्र आम्हाला द्यायची गरज नाही, असं सांगतानाच तुम्ही ज्या शाळेत शिकत आहात. त्या शाळेचे आम्ही हेडमास्तर आहोत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आमचे हेडमास्तर होते. अटलबिहारी वाजपेयी आणि श्यामाप्रसाद मुखर्जीही आमचे हेडमास्तर होते, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवला.
विधेयक म्हणजे काय? त्याचा कायदा कसा बनतो?
...म्हणून शिवसेनेचे घुमजाव?
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून या विधेयकाचे समर्थन करणाऱ्या सर्वच पक्षांना आज लक्ष्य केले होते. ज्यांनी ज्यांनी या विधेयकाचे समर्थन केले ते सगळेच पक्ष देशाच्या मुळावर घाव घालत आहेत, असे राहुल यांनी नमूद केले होते. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या भूमिकेवर तातडीने स्पष्टीकरण दिल्याचे बोलले जात होते. महाराष्ट्रात काँग्रेसने शिवसेनेसोबत आघाडी केली असून शिवसेनेने लोकसभेत घेतलेल्या भूमिकेवर काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनीही आश्चर्य व्यक्त केले होते. शिवसेनेला तटस्थ राहता आले असते असे मतही दलवाई यांनी व्यक्त केले होते.
शिवसेनेसाठी भाजपची दारे सदैव खुली: पाटील