नवी दिल्ली
ईव्हीएम छेडछाडीवरून विरोधी पक्षांनी एकीकडे राळ उठवली आहे. तर दुसरीकडे उद्या होणाऱ्या मतमोजणी दरम्यान हिंसा घडवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा संशय केंद्र सरकारला आहे. यामुळे केंद्र सरकारने राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. याशिवाय प्रक्षोभक वक्त्यव्यांच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्रांची सुरक्षा वाढवण्याची सूचना सर्व राज्यांना करण्यात आली आहे.
देशात वेगवेगळ्या ठिकाणी मतमोजणीदरम्यान हिंसा घडवण्याचा केंद्र सरकारला संशय आहे. त्यामुळे केंद्र सरकारने राज्यांच्या मुख्य सचिवांना आणि पोलिसांना सतर्कतेच्या सूचना केल्या आहेत. राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आदेश दिले आहेत. या शिवाय ईव्हीएम ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्रांची सुरक्षा वाढण्याच्या सूचना केल्या आहेत. काही घटकांकडून मतमोजणीदरम्यान हिंसा घडवण्यासाठी प्रक्षोभक वक्तव्य केली जात आहेत. तसंच अराजकता निर्माण करण्याचे इशारे दिले जात आहेत. यासर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
ईव्हीएमशी छेडछाड किंवा कथित स्वॅपिंग झाल्यास रक्तपात होईल, असं प्रक्षोभक वक्तव्य माजी केंद्रीयमंत्री आणि बिहारमधील राष्ट्रीय लोक समता पार्टीचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी मंगळवारी केलं होतं. एवढचं नव्हे तर गरज पडल्यास शस्त्रही उचलू, असं कुशवाह म्हणाले होते. यामुळे काही ठिकाणी परिस्थिती तणावाची बनली आहे.
ईव्हीएम छेडछाडीवरून विरोधी पक्षांनी एकीकडे राळ उठवली आहे. तर दुसरीकडे उद्या होणाऱ्या मतमोजणी दरम्यान हिंसा घडवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा संशय केंद्र सरकारला आहे. यामुळे केंद्र सरकारने राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. याशिवाय प्रक्षोभक वक्त्यव्यांच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्रांची सुरक्षा वाढवण्याची सूचना सर्व राज्यांना करण्यात आली आहे.
देशात वेगवेगळ्या ठिकाणी मतमोजणीदरम्यान हिंसा घडवण्याचा केंद्र सरकारला संशय आहे. त्यामुळे केंद्र सरकारने राज्यांच्या मुख्य सचिवांना आणि पोलिसांना सतर्कतेच्या सूचना केल्या आहेत. राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आदेश दिले आहेत. या शिवाय ईव्हीएम ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्रांची सुरक्षा वाढण्याच्या सूचना केल्या आहेत. काही घटकांकडून मतमोजणीदरम्यान हिंसा घडवण्यासाठी प्रक्षोभक वक्तव्य केली जात आहेत. तसंच अराजकता निर्माण करण्याचे इशारे दिले जात आहेत. यासर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
ईव्हीएमशी छेडछाड किंवा कथित स्वॅपिंग झाल्यास रक्तपात होईल, असं प्रक्षोभक वक्तव्य माजी केंद्रीयमंत्री आणि बिहारमधील राष्ट्रीय लोक समता पार्टीचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी मंगळवारी केलं होतं. एवढचं नव्हे तर गरज पडल्यास शस्त्रही उचलू, असं कुशवाह म्हणाले होते. यामुळे काही ठिकाणी परिस्थिती तणावाची बनली आहे.