अ‍ॅपशहर

thunderstorm: वादळीवाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज

पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार आणि उत्तरप्रदेश या चार राज्यांना वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा तडाखा बसण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केल्याचे सांगत केंद्रीय गृह मंत्रालयाने या चार राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गेल्या दोनच दिवसात गडगडटासह आलेल्या वादळी पावसामुळे १२४ लोकांचा बळी घेतला असून ३०० हून अधिक लोक जखमी झाल्याची माहितीही गृह मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 May 2018, 8:57 pm
नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम thunderstorm


पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार आणि उत्तरप्रदेश या चार राज्यांना वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा तडाखा बसण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केल्याचे सांगत केंद्रीय गृह मंत्रालयाने या चार राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गेल्या दोनच दिवसात गडगडटासह आलेल्या वादळी पावसामुळे १२४ लोकांचा बळी घेतला असून ३०० हून अधिक लोक जखमी झाल्याची माहितीही गृह मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे.

गडगडाटासह आलेल्या वादळी पावसाच्या तडाख्याने उत्तर प्रदेशात एकूण ७३ लोकांचा बळी घेतला, तर ९१ लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे.

उत्तर प्रदेशात आग्रा भागात सर्वाधिक बळी गेले आहेत अशी माहिती गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिली.

तर, राजस्थानात वादळामुळे ३५ लोक ठार आणि २०६ लोक जखमी झाले. याबरोबरच तेलंगणात ८, उत्तराखंडात ६, पंजाबात २ लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तेलंगण, उत्तराखंड आणि पंजाबात एकूण १०० लोक जखमी झाल्याची माहिती गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिली आहे.

गडगडाटासह आलेल्या पावसामुळे प्रभावित राज्यांमध्ये अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला. अनेक ठिकाणी विजेचे खांब, केबल आणि झाडे कोसळली. यात सुमारे १२ हजार विजेचे खांब कोसळले. शिवाय २५०० ट्रान्स्फॉर्मर्सही निकामी झाले.



याबरेबरच मेघालय, नागालंड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरातील निवडक भागात गडगडाटासह वादळी पाऊस येण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

शिवाय, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब, बिहार, झारखंड, सिक्कीम, ओडिशा, मध्य प्रदेशाचा वायव्य भाग, तेलंगण,रायलसीमा, आंध्र प्रदेशाचा उत्तरेकडील किनारपट्टीचा भाग, तसेच तामिळनाडू आणि केरळमधील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

आसाम, मेघालय आणि त्रिपुरात मुसळधार पाऊस कोसळ्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. याबरोबर राजस्थानमधील काही भागांमध्ये धुळीचे वादळ येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज