रांची : झारखंडमध्ये विरोधी पक्षाचे पाच आमदार बुधवारी भारतीय जनता पक्षात दाखल झाले. सत्ताधारी पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे. राज्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर या राजकीय घडामोडीला महत्त्व प्राप्त झाले आहे. सूत्रांनी सांगितले, की काँग्रेसचे सुखदेव भगत आणि मनोज यादव, जेएमएम पक्षाचे कुणाल सारंगी आणि जयप्रकाश भाई आणि अपक्ष आमदार भानूप्रताप सही यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या आमदारांच्या प्रवेशामुळे ८१ जागांच्या विधानसभेमध्ये भाजपचे संख्याबळ ४८ झाले आहे. भगत हे झारखंड काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत. यादव हे बरकथा येथून निवडून आले आहेत.
झारखंडमध्ये काँग्रेसला घरघर
झारखंडमध्ये विरोधी पक्षाचे पाच आमदार बुधवारी भारतीय जनता पक्षात दाखल झाले सत्ताधारी पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Oct 2019, 4:00 am