हैदराबाद:
आंतरजातीय विवाह करणाऱ्या वीस वर्षीय तरुणीस जिवंत जाळून मारल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी तिच्या आईवडिलांना अटक करण्यात आली आहे. मंचेरियल जिल्ह्यातील कलामाडुगू गावात ही घटना घडली.
पी. अनुराधा असे या तरुणीचे नाव असन, तिने याच गावात राहणाऱ्या दुसऱ्या जातीतील ए. लक्ष्मण या तरुणाशी तीन डिसेंबर रोजी विवाह केला होता. वीस दिवसांनी ते दोघे गावात परतले. याची माहिती मिळताच अनुराधाचे वडील सत्तेण्णा आणि आई लक्ष्मी यांनी काही नातेवाईकांच्या मदतीने लक्ष्मणच्या घरावर हल्ला केला आणि बळजबरीने अनुराधाला घेऊन गेले. निर्मल जिल्ह्यातील मल्लापूर येथे तिला नेण्यात आले आणि तिथे तिची हत्या करण्यात आली. तिचा मृतदेह जाळून अवशेष नदीत टाकून देण्यात आले. या प्रकरणी लक्ष्मणने पोलिसांत तक्रार दिली आहे.
आंतरजातीय विवाह करणाऱ्या वीस वर्षीय तरुणीस जिवंत जाळून मारल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी तिच्या आईवडिलांना अटक करण्यात आली आहे. मंचेरियल जिल्ह्यातील कलामाडुगू गावात ही घटना घडली.
पी. अनुराधा असे या तरुणीचे नाव असन, तिने याच गावात राहणाऱ्या दुसऱ्या जातीतील ए. लक्ष्मण या तरुणाशी तीन डिसेंबर रोजी विवाह केला होता. वीस दिवसांनी ते दोघे गावात परतले. याची माहिती मिळताच अनुराधाचे वडील सत्तेण्णा आणि आई लक्ष्मी यांनी काही नातेवाईकांच्या मदतीने लक्ष्मणच्या घरावर हल्ला केला आणि बळजबरीने अनुराधाला घेऊन गेले. निर्मल जिल्ह्यातील मल्लापूर येथे तिला नेण्यात आले आणि तिथे तिची हत्या करण्यात आली. तिचा मृतदेह जाळून अवशेष नदीत टाकून देण्यात आले. या प्रकरणी लक्ष्मणने पोलिसांत तक्रार दिली आहे.