अ‍ॅपशहर

लढाऊ विमानांसाठी वर्षअखेरपर्यंत करार

‘आमच्या बाजूने करार पूर्ण झाला आहे. त्यावर स्वाक्षरीसाठी आम्ही तयार आहोत. आता भारताला निर्णय घ्यायचा आहे. या वर्षअखेरीपर्यंत त्यावर स्वाक्षरी होईल,’ अशी माहिती रोस्टेक स्टेट कॉर्पोरेशनचे सीईओ सर्जी चेमोझोव्ह यांनी दिली.

Maharashtra Times 17 Oct 2016, 2:56 am
बाणावली (गोवा) : भारताने गोव्यातील ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर सुमारे ६० हजार कोटी रुपयांचे संरक्षण करार केले आहेत. रशियाला आता भारताबरोबर पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानांबाबत या वर्षाअखेरपर्यंत करार होण्याची आशा आहे. ‘आमच्या बाजूने करार पूर्ण झाला आहे. त्यावर स्वाक्षरीसाठी आम्ही तयार आहोत. आता भारताला निर्णय घ्यायचा आहे. या वर्षअखेरीपर्यंत त्यावर स्वाक्षरी होईल,’ अशी माहिती रोस्टेक स्टेट कॉर्पोरेशनचे सीईओ सर्जी चेमोझोव्ह यांनी दिली. रोस्टेक स्टेट कॉर्पोरेशन ही सुमारे ७०० नागरी आणि लष्करी अस्थापनांची शीर्ष संस्था आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मान्यता दिल्यानंतर भारत आणि रशियामध्ये फेब्रुवारीत लढाऊ विमानांच्या प्रकल्पासंदर्भात चर्चेला सुरुवात झाली होती. त्यानंतर विविध मुद्दे मार्गी लागले आहेत. नवीन ऑफरनुसार भारताला या विमानांसाठीच्या तंत्रज्ञानासाठी ६ अब्ज डॉलरऐवजी ३.७ अब्ज डॉलर द्यावे लागतील, असे सूत्रांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज