अ‍ॅपशहर

मोदी सरकारच्या आशीर्वादामुळेच विद्यार्थ्यांवर हल्ला: सोनिया गांधी

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. केंद्र सरकारच्या आशीर्वादामुळेच देशातील तरुणांचा आवाज दाबला जात आहे. तरुणांची खिल्ली उडवली जात असून गुंडांद्वारे हिंसा भडकवली जात आहे, अशा शब्दात सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Jan 2020, 3:50 pm
नवी दिल्ली: दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. केंद्र सरकारच्या आशीर्वादामुळेच देशातील तरुणांचा आवाज दाबला जात आहे. तरुणांची खिल्ली उडवली जात असून गुंडांद्वारे हिंसा भडकवली जात आहे, अशा शब्दात सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sonia-gandhi


जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर भ्याड हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला लोकांच्या असहमतीचा आवाज दाबण्यासाठी सरकारने घडवून आणला असल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी यावेळी केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदवला होता. बुरखाधारी गुंडांनी विद्यार्थ्यांवर केलेला हा हल्ला धक्कादायक आहे. या हल्ल्यात अनेक विद्यार्थी गंभीरपणे जखमी झाले आहेत. सध्या आपला देश फॅसिस्टांच्या नियंत्रणात आहे. मात्र अशा शक्तींना विद्यार्थी घाबरत नाहीत, असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.


जेएनयूत विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ला

रविवारी संध्याकाळी काही बुरखाधारी तरुणांनी जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ला केला होता. त्यात ३४ विद्यार्थी जखमी झाले होते. याप्रकरणी बुरखाधारी हल्लेखोरांवर आज सकाळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जेएनयूतील हिंसाचाराबाबत अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्या तक्रारींचा तपशील लक्षात घेऊन दंगल भडकावणे तसेच मालमत्तेचे नुकसान करणे या आरोपांखाली हल्लेखोरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अद्याप एकाही आरोपीला अटक झालेली नसली तरी हल्लेखोरांची ओळख पटल्याचा दावा पोलीस करत आहेत. याबाबत अधिक तपशील मात्र पोलिसांनी उघड केलेला नाही. दुसरीकडे जेएनयूच्या कॅम्पसमधील तणाव कमी करण्यासाठी पोलिसांनी वेगाने पावले उचलली आहेत. कॅम्पसध्ये फ्लॅग मार्चही करण्यात आला. सध्या संपूर्ण परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


JNU हल्ला: मुंबई, पुण्यात मध्यरात्री निदर्शने

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज