नवी दिल्ली : 'रुग्णालये आणि राज्य सरकारे यांच्याकडून करोनासंबंधी मृत्यूंची चुकीची नोंदणी करणे हे देशाच्या करोनाविरोधी लढ्यासाठी हानिकारक आहे. करोना मृत्यूंचा योग्य आकडा समोर यावा, यासाठी त्यांनी करोना मृत्यूंचे ऑडिट करण्याची गरज आहे, त्याद्वारे मृत्यूंचे नेमके चित्र स्पष्ट होईल,' अशी स्पष्ट भूमिका 'ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस'चे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी शनिवारी मांडली.
विविध राज्ये करोना मृत्यूंच्या आकड्यांची लपवाछपवी करीत असल्याच्या बातम्या; तसेच या संदर्भातील आरोपांच्या पार्श्वभूमीवर डॉ. गुलेरिया यांनी ही भूमिका मांडली आहे. महाराष्ट्रात करोनाचे प्रत्यक्ष मृत्यू हे राज्याने जाहीर केलेल्या आकड्यापेक्षा ११ हजारांनी अधिक असल्याने नुकतेच 'मटा'ने उघडीस आणले होते. तर, मध्य प्रदेशात एप्रिलमध्ये मृत्यूंचा आकडा आणि अंत्यसंस्कार केलेल्या व्यक्ती यांच्या आकड्यात मोठी तफावत दिसून आली आहे.
एखादी व्यक्ती हृदयविकाराच्या धक्क्याने मरण पावली आणि तिला करोनाचा संसर्ग झाला असेल, तर करोनाचा संसर्ग हा हृदयविकाराच्या धक्क्याला कारणीभूत ठरलेला असू शकतो. अशा वेळी हा मृत्यू बिगर-करोना मृत्यू म्हणून न नोंदवता, हृदयविकाराशी संबंधित मृत्यू म्हणून नोंदवला जाऊ शकतो, याकडे डॉ. गुलेरिया यांनी लक्ष वेधले.
मृत्यूंची योग्य वर्गवारीत नोंद करणे हे करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर आवश्यक आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. विषाणूच्या स्वरूपात होणारे बदल आणि बेफिकीर मानवी वर्तन ही दोन कारणे जगभरात, विशेषत: भारतात करोनाच्या एकाहून अधिक लाटा येण्यास कारणीभूत आहेत, असे मत डॉ. गुलेरिया यांनी मांडले.
विविध राज्ये करोना मृत्यूंच्या आकड्यांची लपवाछपवी करीत असल्याच्या बातम्या; तसेच या संदर्भातील आरोपांच्या पार्श्वभूमीवर डॉ. गुलेरिया यांनी ही भूमिका मांडली आहे. महाराष्ट्रात करोनाचे प्रत्यक्ष मृत्यू हे राज्याने जाहीर केलेल्या आकड्यापेक्षा ११ हजारांनी अधिक असल्याने नुकतेच 'मटा'ने उघडीस आणले होते. तर, मध्य प्रदेशात एप्रिलमध्ये मृत्यूंचा आकडा आणि अंत्यसंस्कार केलेल्या व्यक्ती यांच्या आकड्यात मोठी तफावत दिसून आली आहे.
एखादी व्यक्ती हृदयविकाराच्या धक्क्याने मरण पावली आणि तिला करोनाचा संसर्ग झाला असेल, तर करोनाचा संसर्ग हा हृदयविकाराच्या धक्क्याला कारणीभूत ठरलेला असू शकतो. अशा वेळी हा मृत्यू बिगर-करोना मृत्यू म्हणून न नोंदवता, हृदयविकाराशी संबंधित मृत्यू म्हणून नोंदवला जाऊ शकतो, याकडे डॉ. गुलेरिया यांनी लक्ष वेधले.
मृत्यूंची योग्य वर्गवारीत नोंद करणे हे करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर आवश्यक आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. विषाणूच्या स्वरूपात होणारे बदल आणि बेफिकीर मानवी वर्तन ही दोन कारणे जगभरात, विशेषत: भारतात करोनाच्या एकाहून अधिक लाटा येण्यास कारणीभूत आहेत, असे मत डॉ. गुलेरिया यांनी मांडले.