नवी दिल्ली : 'लष्कराबद्दल अपशब्द वापरणे, नौदलप्रमुखांची उघडपणे बदनामी केली जाते. जवानांवरही दगडफेक करण्यात येते. इतके स्वातंत्र्य आपल्या देशात असताना तुम्हाला या देशात आणखी किती स्वातंत्र्य हवे आहे,' असा सवाल प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी अभिनेते नसिरुद्दीन शहा यांनी केलेल्या विधानावर केला आहे. 'त्यांना (नसिरुद्दीन शहा) जे सांगायचे होते, ते त्यांनी सांगितले. मात्र ते खरे आहे, असे म्हणण्याची गरज नाही,' असेही खेर म्हणाले. 'नसीर यांनी बुलंदशहर हिंसाचारावर मतप्रदर्शन करताना, एका पोलिस निरीक्षकाच्या मृत्यूपेक्षा गायीच्या मृत्यूला महत्त्व दिले जात आहे, ही गंभीर बाब आहे. समाजात ज्या प्रकारे सध्या विष फैलावले आहे, ते पाहून मला माझ्या मुलांचीही चिंता वाटू लागली आहे,' असे विधान केले होते.
‘आणखी किती स्वातंत्र्य हवे?’
'लष्कराबद्दल अपशब्द वापरणे, नौदलप्रमुखांची उघडपणे बदनामी केली जाते जवानांवरही दगडफेक करण्यात येते...
30 23 Dec 2018, 4:00 am