अ‍ॅपशहर

झारखंडमध्ये भूकबळी?

झारखंडच्या जमशेदपूर जिल्ह्यातील सोनुआ भागात वृद्धेचा उपासमारीने मृत्यू झाल्याचे वृत्त माध्यमांमधून प्रसिद्ध झाल्यानंतर राज्य सरकारने घटनेची चौकशी करण्यासाठी पथक पाठविले आहे. राज्यमंत्री सरयू रॉय यांनी याबाबत माहिती दिली.

Maharashtra Times 9 Dec 2018, 2:16 am
वृत्तसंस्था, जमशेदपूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hunger in jharkhand
झारखंडमध्ये भूकबळी?


झारखंडच्या जमशेदपूर जिल्ह्यातील सोनुआ भागात वृद्धेचा उपासमारीने मृत्यू झाल्याचे वृत्त माध्यमांमधून प्रसिद्ध झाल्यानंतर राज्य सरकारने घटनेची चौकशी करण्यासाठी पथक पाठविले आहे. राज्यमंत्री सरयू रॉय यांनी याबाबत माहिती दिली.

सरकारी डॉक्टर, गटविकास अधिकारी आणि जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांचा पथकात समावेश असल्याचे रॉय यांनी सांगितले. मृत महिला ही ६५ वर्षांची असून, ती पोरहत मध्ये एकटी राहत होती. ती रेशनकार्ड धारक आणि सरकारच्या निवृत्तवेतन योजनेची लाभार्थीदेखील होती. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून तिला कोणताही लाभ मिळत नव्हता, असे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. त्यामुळे शवविच्छेदन करून महिलेच्या मृत्यूचे अचूक कारण शोधण्याची सूचना पथकाला देण्यात आल्याचे रॉय यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज