अ‍ॅपशहर

पत्नीने दिला धोका; बदला घेण्यासाठी ज्याच्यासोबत पळाली त्याच्या बायकोला...; वाचून हैराण व्हाल

Extra Marital Affair: प्रेम किती आंधळं असतं हे कोणीही सांगू शकत नाही. ज्या व्यक्तीने बायकोला पळवून नेलं त्याच्याच पत्नीसोबत एका व्यक्तीने लग्न केल्याची घटना घडली आहे. ही घटना इतकी विचित्र आहे की अख्ख्या गावात त्याची चर्चा सुरु आहे.

Authored byनुपूर उप्पल | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Feb 2023, 7:59 pm
खगरिया: प्रेमप्रकरणातून अनेकदा विवाहित महिला किंवा पुरुष आपल्या जोडीदाराला सोडण्याचा निर्णय घेतात. पण, बिहारच्या खगरिया जिल्ह्यातील प्रेमप्रकरणाची जी घटना समोर आली आहे ती वाचून तुम्ही हैराण व्हाल. येथे पत्नीने आपल्या पतीला धोका दिला म्हणून पतीने बदला घेण्यासाठी त्या व्यक्तीच्या पत्नीशी लग्न केले ज्याच्यासोबत त्याच्या पत्नीचे अनैतिक संबंध होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम khagaria marriage


पाहुयात नेमकं प्रकरण काय?

खगरियाच्या चौथम ब्लॉकमधील हरदिया गावातील रहिवासी असलेल्या नीरजचे लग्न पसरहा गावात रुबी देवीसोबत २००९ मध्ये झाले होते. दोघांनाही चार मुलं होती. मात्र, रुबी देवीचे पसरहा गावात राहणाऱ्या मुकेशसोबत प्रेमसंबंध सुरू होते. मुकेशचंही लग्न झालेलं होतं. त्यालाही दोन मुलं होती. पण, या दोघांनी कसलाही विचार न करता फेब्रुवारी २०२२ मध्ये पळून जाऊन लग्न केलं. इतकंच नाही तर ते आपल्या दोन मुली आणि एका मुलाला सोबत घेऊन गावातून फरार झाले.

नीरजने बदला घेण्याचं ठरवलं अन्

नीरजला त्याची पत्नी प्रियकर मुकेशसोबत पळून गेल्याचे समजताच नीरजने मुकेशविरुद्ध पसरहा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. नीरजने सांगितले की, अनेकवेळा गावात पंचायतही झाली पण मुकेश काही ऐकला नाही. मुकेश नीरजची बायको रुबीसोबत कधी या गावात तर कधी त्या गावात राहत होता. मग नीरजनेही बदला घेण्याचे ठरवलं. नीरजने आरोपी मुकेशच्या पत्नीसोबत पळून जाऊन लग्न केलं. विशेष म्हणजे या दोघांच्याही पत्नीचे नाव रुबी आहे.

दोघं एकमेकांच्या प्रेमात कधी पडले त्यांनाही कळाले नाही

मुकेशचा विवाह अमानी गावातील रुबी देवीसोबत झाला होता. मुकेश त्याच्या पहिल्या पत्नीला सोडून नीरजच्या पत्नीसोबत राहत होता. मुकेशचा बदला घेण्यासाठी नीरज मुकेशची पत्नी रुबीला फोन केला. नीरजने तिला सांगितलं की आपल्या नवऱ्याला समजावं. या संदर्भात नीरज आणि मुकेशची पत्नी रुबी यांच्यात अनेकदा फोनवर संवाद होऊ लागला. संवादाचे प्रेमात रुपांतर कधी झाले हे नीरज किंवा मुकेशची पत्नी रुबीला कळाले नाही. दोघांनाही आधाराची गरज होती. अशा परिस्थितीत दोघांनी १८ फेब्रुवारी २०२३ रोजी गावातून पळून जाऊन मंदिरात लग्न केले. या लग्नाची चर्चा आता अख्ख्या गावात होऊ लागली आहे.
लेखकाबद्दल
नुपूर उप्पल
नुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा... आणखी वाचा

महत्वाचे लेख