उत्तर प्रदेश:
एक सुप्रसिद्ध अभिनेत्री असल्याचा राजकारणात खूप फायदा झाला असल्याची भावना रामपूर मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार असलेल्या जयाप्रदा यांनी व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेशच्या रामपूर मतदारसंघातून यावेळी जयाप्रदा यांनी लोकसभेची निवडणूक लढवली आहे.
चित्रपटांमधून लोकप्रिय झाल्यानंतर जयाप्रदा यांनी राजकारणात प्रवेश केला. उत्तर प्रदेश आणि तेलंगणामधून जयाप्रदा यांनी याआधी निवडणुका लढवल्या आहे. यावेळी त्यांच्या राजकीय कारकीर्दीबद्दल प्रश्न विचारलं असता त्या म्हणाल्या,' चित्रपटांमध्ये अभिनय केल्यामुळे मी लोकप्रिय झाले. या लोकप्रियतेचा मला राजकारणात निश्चित फायदा झाला. त्यामुळे मी लोकांपर्यंत सहजपणे पोहोचू शकले.'
'माझा विजय मोदी लाटेमुळे'
या निवडणुकीत मी जिंकले तर केवळ मोदी लाटेमुळे जिंकेल अशी भावना जयाप्रदा यांनी व्यक्त केली आहे. रामपूर मतदारसंघातून त्या पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. तसंच मोदींनी त्यांना संधी दिल्याबद्दल त्यांनी मोदींचे आभारही मानले आहेत. काही दिवसांपूर्वी समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी जयाप्रदा यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर उतरून टीका केली होती. यामुळे देशातील अनेक स्त्रीवादी कार्यकर्त्यांनी आझमखान यांच्यावर भरपूर टीका केली आहे. याबद्दल विचारलं असता जयाप्रदा म्हणाल्या,'सुरुवातीला मला या टीकेचा भरपूर त्रास व्हायचा . आता मात्र मला या टीकेचा तितकासा त्रास होत नाही. अशा प्रतिक्रियांकडे मी आता दुर्लक्ष करायला शिकले आहे'.
आज सकाळापासून आलेल्या कलांमध्ये जयाप्रदा काही काळ आघाडीवर तर काही काळ पिछाडीवर दिसत आहेत. तेव्हा यावेळी त्या निवडणूक जिंकतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सतराव्या लोकसभेसाठी देशातील ५४३ मतदारसंघात निवडणूक झाली होती. त्यापैकी ५४२ जागांचे निकाल जाहीर होणार आहेत. पैशाचा अमाप वापर झाल्याचे सिद्ध झाल्याने तमिळनाडूतील वेल्लूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक आयोगाने रद्द केली आहे. अंतिम निकाल गुरुवारी मध्यरात्री ते शुक्रवार सकाळपर्यंतच हाती येण्याची शक्यता असली तरी 'विजेता कोण?' हे चित्र संध्याकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे. देशातील ५४२ जागांची मतमोजणी सुरू झाली आहे. गेल्यावेळी भाजपला २८२ जागांवर विजय मिळाला होता. तर भाजप आघाडीला ३३६ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला ४४ जागांवर समाधान मानावे लागले होते.
एक सुप्रसिद्ध अभिनेत्री असल्याचा राजकारणात खूप फायदा झाला असल्याची भावना रामपूर मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार असलेल्या जयाप्रदा यांनी व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेशच्या रामपूर मतदारसंघातून यावेळी जयाप्रदा यांनी लोकसभेची निवडणूक लढवली आहे.
चित्रपटांमधून लोकप्रिय झाल्यानंतर जयाप्रदा यांनी राजकारणात प्रवेश केला. उत्तर प्रदेश आणि तेलंगणामधून जयाप्रदा यांनी याआधी निवडणुका लढवल्या आहे. यावेळी त्यांच्या राजकीय कारकीर्दीबद्दल प्रश्न विचारलं असता त्या म्हणाल्या,' चित्रपटांमध्ये अभिनय केल्यामुळे मी लोकप्रिय झाले. या लोकप्रियतेचा मला राजकारणात निश्चित फायदा झाला. त्यामुळे मी लोकांपर्यंत सहजपणे पोहोचू शकले.'
'माझा विजय मोदी लाटेमुळे'
या निवडणुकीत मी जिंकले तर केवळ मोदी लाटेमुळे जिंकेल अशी भावना जयाप्रदा यांनी व्यक्त केली आहे. रामपूर मतदारसंघातून त्या पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. तसंच मोदींनी त्यांना संधी दिल्याबद्दल त्यांनी मोदींचे आभारही मानले आहेत. काही दिवसांपूर्वी समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी जयाप्रदा यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर उतरून टीका केली होती. यामुळे देशातील अनेक स्त्रीवादी कार्यकर्त्यांनी आझमखान यांच्यावर भरपूर टीका केली आहे. याबद्दल विचारलं असता जयाप्रदा म्हणाल्या,'सुरुवातीला मला या टीकेचा भरपूर त्रास व्हायचा . आता मात्र मला या टीकेचा तितकासा त्रास होत नाही. अशा प्रतिक्रियांकडे मी आता दुर्लक्ष करायला शिकले आहे'.
आज सकाळापासून आलेल्या कलांमध्ये जयाप्रदा काही काळ आघाडीवर तर काही काळ पिछाडीवर दिसत आहेत. तेव्हा यावेळी त्या निवडणूक जिंकतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सतराव्या लोकसभेसाठी देशातील ५४३ मतदारसंघात निवडणूक झाली होती. त्यापैकी ५४२ जागांचे निकाल जाहीर होणार आहेत. पैशाचा अमाप वापर झाल्याचे सिद्ध झाल्याने तमिळनाडूतील वेल्लूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक आयोगाने रद्द केली आहे. अंतिम निकाल गुरुवारी मध्यरात्री ते शुक्रवार सकाळपर्यंतच हाती येण्याची शक्यता असली तरी 'विजेता कोण?' हे चित्र संध्याकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे. देशातील ५४२ जागांची मतमोजणी सुरू झाली आहे. गेल्यावेळी भाजपला २८२ जागांवर विजय मिळाला होता. तर भाजप आघाडीला ३३६ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला ४४ जागांवर समाधान मानावे लागले होते.