वृत्तसंस्था, नवी दिल्ली
पाकिस्तानात बेपत्ता झालेले हजरत निजामुद्दिन दर्ग्यातील मुख्य धर्मगुरू सईद असिफ निझामी आणि त्यांचे पुतणे नझिम अली निझामी हे सोमवारी भारतात परतले. या दोघांच्या स्वागतासाठी त्यांचे कुटुंबीय आणि हितचिंतक विमानतळावर उपस्थित होते. पाकिस्तानने या दोघांना स्थानबद्ध केले होते, अशी माहिती असिफ यांचे पुत्र साजिद यांनी दिली.
हे दोघे ८ मार्चला असिफ यांच्या बहिणीला भेटण्यासाठी कराचीला गेले होते. १३ मार्चला त्यांनी लाहोरमध्ये पाकपट्टन येथील सुफी संत बाबा फरीद गंग यांच्या दर्ग्याला भेट दिली. त्यानंतर १४ मार्चपासून दोघेही लाहोरमधून बेपत्ता होते. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र सल्लागार सरताज अझीझ यांच्याकडे हा मुद्दा उपस्थित करून उभयतांचा शोध घेण्याची विनंती केली होती.
यानंतर वेगवान घडामोडी घडल्या. ‘दोन्ही धर्मगुरूंचा ठावठिकाणा समजला असून, ते कराचीत पोहोचले आहेत,’ अशी माहिती पाकिस्तानकडून भारताला शनिवारी देण्यात आली होती. यानंतर या दोघांच्या मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा झाला.
स्वराज यांचे आभार
या दोघांनी मायदेशी परतल्यानंतर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली. स्वराज यांनी केलेल्या पाठपुराव्याबद्दल या दोघांनी त्यांचे तसेच केंद्र सरकारचे आभार मानले.
खोडसाळ बातमी
भारतातून येथे आलेले दोन धर्मगुरू हे प्रत्यक्षात भारतीय गुप्तहेर संघटना रॉचे एजंट आहेत, अशा आशयाचे वृत्त कराची येथील एका दैनिकात प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताच्या आधारे आम्हाला ताब्यात घेण्यात आले, असे नझिम यांनी सांगितले.
पाकिस्तानात बेपत्ता झालेले हजरत निजामुद्दिन दर्ग्यातील मुख्य धर्मगुरू सईद असिफ निझामी आणि त्यांचे पुतणे नझिम अली निझामी हे सोमवारी भारतात परतले. या दोघांच्या स्वागतासाठी त्यांचे कुटुंबीय आणि हितचिंतक विमानतळावर उपस्थित होते. पाकिस्तानने या दोघांना स्थानबद्ध केले होते, अशी माहिती असिफ यांचे पुत्र साजिद यांनी दिली.
हे दोघे ८ मार्चला असिफ यांच्या बहिणीला भेटण्यासाठी कराचीला गेले होते. १३ मार्चला त्यांनी लाहोरमध्ये पाकपट्टन येथील सुफी संत बाबा फरीद गंग यांच्या दर्ग्याला भेट दिली. त्यानंतर १४ मार्चपासून दोघेही लाहोरमधून बेपत्ता होते. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र सल्लागार सरताज अझीझ यांच्याकडे हा मुद्दा उपस्थित करून उभयतांचा शोध घेण्याची विनंती केली होती.
यानंतर वेगवान घडामोडी घडल्या. ‘दोन्ही धर्मगुरूंचा ठावठिकाणा समजला असून, ते कराचीत पोहोचले आहेत,’ अशी माहिती पाकिस्तानकडून भारताला शनिवारी देण्यात आली होती. यानंतर या दोघांच्या मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा झाला.
स्वराज यांचे आभार
या दोघांनी मायदेशी परतल्यानंतर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली. स्वराज यांनी केलेल्या पाठपुराव्याबद्दल या दोघांनी त्यांचे तसेच केंद्र सरकारचे आभार मानले.
खोडसाळ बातमी
भारतातून येथे आलेले दोन धर्मगुरू हे प्रत्यक्षात भारतीय गुप्तहेर संघटना रॉचे एजंट आहेत, अशा आशयाचे वृत्त कराची येथील एका दैनिकात प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताच्या आधारे आम्हाला ताब्यात घेण्यात आले, असे नझिम यांनी सांगितले.