कोलकाताः पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकारण तापू लागलं आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( mamata banerjee ) यांनी सोमवारी नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून ( nandigram assembly seat ) आगामी निवडणूक लढवण्याची घोषणा केली. सुवेंदू अधिकरी ( suvendu adhikari ) यांनी २०१६ मध्ये नंदीग्राममधून निवडणूक जिंकली होती. सुवेंदू अधिकरींयांनी अलिकडेच तृणमूल कॉंग्रेस (TMC) सोडून भाजपमध्ये प्रवेश आहे.
पूर्व मिदनापूरमधील नंदीग्राम मतदारसंघ हा सुवेंदू अधिकरीं यांचा बालेकिल्ला मानला जातो. पक्ष बदलल्याने काही काही फरक पडत नाही. टीएमसीची स्थापना झाली तेव्हा यातील कोणीही पक्षात नव्हतं. शक्य झाल्यास नंदीग्राम आणि भवानीपूर या दोन्ही मतदारसंघातून निवडणूक लढवेन, असं ममता बॅनर्जी एका जाहीर सभेत म्हणाल्या.
TMC मधून अनेक पक्षनेते बाहेर
गेल्या महिन्यात १९ डिसेंबरला सुवेंदू अधिकरीं यांच्यासह खासदार सुनील मंडल, माजी खासदार दशरथ तिर्की आणि १० आमदारांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. यातील ५ आमदार हे टीएमसीचे होते. यापूर्वी, गेल्या महिन्यात तापसी मंडल, अशोक डिंडा, सुदीप मुखर्जी, सैकत पांजा, शीलभद्र दत्ता, दिपाली बिस्वास, शुक्र मुंडा, श्यांपदा मुखर्जी, विश्वजित कुंडू आणि बनश्री माइती यांनी गेल्या महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केला होता.
नंदीग्राममधून का लढवताहेत ममता निवडणूक?
नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातील टीएमसीचे बंडखोर सुवेंदू अधिकरीं यांच्या कुटुंबीयांचं पूर्व मिदनापूरवर वर्चस्व आहे. शुभेंदू यांचे वडील कॉंग्रेसचे आमदार आणि खासदार होते. यूपीए सरकारमध्ये ते ग्रामविकास राज्यमंत्री होते आणि आता ते तृणमूलचे खासदार आहेत. खुद्द सुवेंदू हे सलग आमदार आणि खासदारकीची निवडणूक जिंकत आले आहेत. सुवेंदू यांचा एक भाऊ खासदार आणि दुसरा नगरपालिका अध्यक्ष आहे. ६ जिल्ह्यातील ८० हून अधिक जागांवर या कुटुंबाचा प्रभाव आहे. यामुळे बालेकिल्ला कोणाचाही असो आपलचं चालेल इतर कुणाचं नाही, हे ममतांच्या नंदीग्राममधून निवडणूक लढण्यामागचं कारण आहे.
टीएमसीच्या ४१ आमदारांची यादी आपल्याकडे असून त्यांना भाजपमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, असा दावा पश्चिम बंगाल भाजपचे प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनी १४ जानेवारीला केला होता. हे आमदार भाजपमध्ये आले तर इथलं सरकार पडेल, असं विजयवर्गीय म्हणाले.
ओवैसींबद्दल बोलताना भाजप खासदाराची जीभ घसरली
'हिंदू-मुस्लीम दंगे घडवणारा भाजप कोव्हिडपेक्षाही जास्त धोकादायक'
पश्चिम बंगाल तापलं
भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा हे १० डिसेंबरला बंगाल दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांच्या कारवर हल्ला करण्यात आला होता. यात बंगालचे प्रभारी कैलास विजयवर्गीयही जखमी झाले होते. हल्ल्याच्या एक महिन्यानंतर, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा पुन्हा ९ जानेवारीला बंगालच्या दौर्यावर होते. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे, असं वर्धमानमधील जाहीर सभेत नड्डा म्हणाले. तृणमूलचा कार्यकर्ता हा ताडपत्री चोर आहे. अम्फान वादळाच्या वेळी केंद्राने तात्पुरती घरे बांधण्यासाठी नागरिकांना ताडपत्री पाठवली होती. पण टीएमसीचे कार्यकर्त्यांनी ताडपत्र्या आपल्या घरी नेल्या, अशी टीका नड्डा यांनी केली.
पूर्व मिदनापूरमधील नंदीग्राम मतदारसंघ हा सुवेंदू अधिकरीं यांचा बालेकिल्ला मानला जातो. पक्ष बदलल्याने काही काही फरक पडत नाही. टीएमसीची स्थापना झाली तेव्हा यातील कोणीही पक्षात नव्हतं. शक्य झाल्यास नंदीग्राम आणि भवानीपूर या दोन्ही मतदारसंघातून निवडणूक लढवेन, असं ममता बॅनर्जी एका जाहीर सभेत म्हणाल्या.
TMC मधून अनेक पक्षनेते बाहेर
गेल्या महिन्यात १९ डिसेंबरला सुवेंदू अधिकरीं यांच्यासह खासदार सुनील मंडल, माजी खासदार दशरथ तिर्की आणि १० आमदारांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. यातील ५ आमदार हे टीएमसीचे होते. यापूर्वी, गेल्या महिन्यात तापसी मंडल, अशोक डिंडा, सुदीप मुखर्जी, सैकत पांजा, शीलभद्र दत्ता, दिपाली बिस्वास, शुक्र मुंडा, श्यांपदा मुखर्जी, विश्वजित कुंडू आणि बनश्री माइती यांनी गेल्या महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केला होता.
नंदीग्राममधून का लढवताहेत ममता निवडणूक?
नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातील टीएमसीचे बंडखोर सुवेंदू अधिकरीं यांच्या कुटुंबीयांचं पूर्व मिदनापूरवर वर्चस्व आहे. शुभेंदू यांचे वडील कॉंग्रेसचे आमदार आणि खासदार होते. यूपीए सरकारमध्ये ते ग्रामविकास राज्यमंत्री होते आणि आता ते तृणमूलचे खासदार आहेत. खुद्द सुवेंदू हे सलग आमदार आणि खासदारकीची निवडणूक जिंकत आले आहेत. सुवेंदू यांचा एक भाऊ खासदार आणि दुसरा नगरपालिका अध्यक्ष आहे. ६ जिल्ह्यातील ८० हून अधिक जागांवर या कुटुंबाचा प्रभाव आहे. यामुळे बालेकिल्ला कोणाचाही असो आपलचं चालेल इतर कुणाचं नाही, हे ममतांच्या नंदीग्राममधून निवडणूक लढण्यामागचं कारण आहे.
टीएमसीच्या ४१ आमदारांची यादी आपल्याकडे असून त्यांना भाजपमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, असा दावा पश्चिम बंगाल भाजपचे प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनी १४ जानेवारीला केला होता. हे आमदार भाजपमध्ये आले तर इथलं सरकार पडेल, असं विजयवर्गीय म्हणाले.
ओवैसींबद्दल बोलताना भाजप खासदाराची जीभ घसरली
'हिंदू-मुस्लीम दंगे घडवणारा भाजप कोव्हिडपेक्षाही जास्त धोकादायक'
पश्चिम बंगाल तापलं
भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा हे १० डिसेंबरला बंगाल दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांच्या कारवर हल्ला करण्यात आला होता. यात बंगालचे प्रभारी कैलास विजयवर्गीयही जखमी झाले होते. हल्ल्याच्या एक महिन्यानंतर, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा पुन्हा ९ जानेवारीला बंगालच्या दौर्यावर होते. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे, असं वर्धमानमधील जाहीर सभेत नड्डा म्हणाले. तृणमूलचा कार्यकर्ता हा ताडपत्री चोर आहे. अम्फान वादळाच्या वेळी केंद्राने तात्पुरती घरे बांधण्यासाठी नागरिकांना ताडपत्री पाठवली होती. पण टीएमसीचे कार्यकर्त्यांनी ताडपत्र्या आपल्या घरी नेल्या, अशी टीका नड्डा यांनी केली.