अ‍ॅपशहर

पक्षाने सांगितल्यास पुस्तक मागे घेईन: जय भगवान गोयल

'आज के शिवाजी-नरेंद्र मोदी' या वादग्रस्त पुस्तकाला मोठ्या प्रमाणात विरोध होऊ लागल्यानंतर या पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांनी एक पाऊल मागे घेण्याची भूमिका घेतली आहे. पक्षाने आदेश दिल्यास हे पुस्तक मागे घेऊ, असे लेखक जयभगवान गोयन यांनी स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Jan 2020, 2:22 pm

पवारांना जाणता राजा म्हटलेलं कसं चालतं?: मुनगंटीवार

नवी दिल्ली: 'आज के शिवाजी-नरेंद्र मोदी' या वादग्रस्त पुस्तकाला मोठ्या प्रमाणात विरोध होऊ लागल्यानंतर या पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांनी एक पाऊल मागे घेण्याची भूमिका घेतली आहे. पक्षाने आदेश दिल्यास हे पुस्तक मागे घेऊ, असे लेखक जयभगवान गोयन यांनी स्पष्ट केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज ज्या प्रकारे काम करत असत, त्याच प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काम करत असल्याने आपण मोदी यांचा उल्लेख महाराजांच्या नावे केला असे गोयल यांनी म्हटले आहे. या पुस्तकाद्वारे कुणाच्याही भावना दुखावण्याचा आपला हेतू नसल्याचेही गोयल यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम जय भगवान गोयल



पुस्तकावरील वादानंतर पुस्तक मागे घेणार का असा प्रशअ्न गोयल यांना विचारण्यात आला. त्यावर, 'आज के शिवाजी-नरेंद्र मोदी' हे आपले पुस्तक आता बाजारात आले असून, जर पक्षाने सांगितले, तर पुस्तक मागे घेऊ, असे गोयल यांनी म्हटले आहे. अनेकजण राम, कृष्ण असे म्हणत लोकांची तुलना देवांशी करतात. मी काही चुकीचे काम केले असे मला वाटत नाही असे मला वाटते, असेही गोयल म्हणाले.

शिवरायांशी तुलना करणाऱ्यांना आवरा: शिवेंद्रराजे

आपल्या पुस्तकाचे समर्थन करताना गोयल म्हणाले की, आपण पाहिले असेल की गेल्या अनेक वर्षांपासून भारताला कुणीही वाली नव्हता. देशाच्या संसदेवरही दहशतवादी हल्ला झाला. मुंबईतही दहशतवादी हल्ला झाल्याचेही आपण पाहिले आहे. मात्र, नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यापासून देशामध्ये एकही दहशतवादी हल्ला झालेला नाही. पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरमध्ये घुसून हल्ला केला होता. या हल्ल्याला पाकिस्तानमध्ये घुसून मोदी सरकारने प्रत्युत्तर देण्याचे काम केले.

मोदींची तुलना: शिवाजी महाराज कुठे, हे कुठे!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी नेहमीच राज्यातील प्रत्येक व्यक्ती, माता, बहिणींची चिंता वाहिली. त्याच प्रमाणे पंतप्रधान मोदी हे देखील देशातील माता आणि बहिणींच्या सुरक्षेसाठी काम करताना दिसत असल्याचे गोयल म्हणाले. मोदी सरकारच्या राज्यात देशातील प्रत्येक महिलेला सुरक्षित आणइ सक्षम असल्याचे वाटत आहे. जसे छत्रपती शिवाजी महाराज काम करत होते, तसेच काम नरेंद्र मोदी करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये जगभरात भारताचा सन्मान वाढला आहे, असे गोयल म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज