अ‍ॅपशहर

IAS अधिकारी सौम्या पांडेय यांची कानपूर ग्रामीणला बदली

मूळ प्रयागराजच्या राहणाऱ्या आयएएस अधिकारी सौम्या पांडेय (Saumya Pandey IAS) या २०१७ च्या बॅचच्या अधिकारी आहेत. त्या गाझियाबादमध्ये मोदीनगरच्या उपविभागीय दंडाधिकारी या पदावर कार्यरत होत्या. सौम्या पांडेय यांनी आपली नियुक्ती झाल्याबरोबर आपल्या कामाने आपल्या कर्तव्यनिष्ठतेचे उदाहरण सर्वांपुढे ठेवले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Oct 2020, 6:21 pm
गाझियाबाद: गाझियाबादच्या मोदीनगर एसडीएमच्या पदावर कार्यरत आयएएस अधिकारी सौम्या पांडेय यांची बदली कानपूर ग्रामीणमध्ये झाली आहे. सौम्या पांडेय या गेल्या काही दिवसांपासून आपल्या १४ दिवसांच्या चिमुकलीला घेऊन कार्यालयात काम दिसल्यानंतर चर्चेच आहेत. कोविड-१९ महासाथीच्या संकटकाळात आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवत प्रसूतीनंतर काही दिवसांतच मुलीला घेऊन त्या कार्यालयात दाखल झाल्या. स्वत:च्या काळजीसह आपल्या मुलीची काळजी घेत त्या आपली जबाबदारीही पार पाडत आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम सौम्या पांडेय यांची कानपूर ग्रामीणला बदली


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सौम्या पांडेय यांची बदली कानपूर ग्रामीणमध्ये केली आहे. सौम्या पांडेय यांना कानपूर ग्रामीणच्या मुख्य जिल्हाधिकारीपद देण्यात आले आहे. कानपूरला बदली झाल्यामुले त्यांच्या मूळ निवासाचे अंतर कमी झाले आहे.

प्रयागराजच्या राहणाऱ्या आहेत सौम्या पांडेय

सौम्या पांडेय या मूळच्या प्रयागराजच्या रहिवासी आहेत. सौम्या यांनी मुलीला जन्म दिल्यानंतर केवळ २२ दिवसांची सुट्टी घेतली आणि त्यानंतर त्या कार्यालयात रुजू झाल्या. कार्यालयात त्या आपल्या मुलीला जवळ घेऊन काम करताना दिसत होत्या. हे पाहून सगळीकडे त्यांच्या कर्तव्यदक्षतेची चर्चा सुरू झाली.

सावधगिरी बाळगत घेतली मुलीची काळजी

ज्या पदाची जबाबदारी आपल्यावर सोपवण्यात आली आहे, त्या पदाला न्याय देणे हे आपले कर्तव्य असल्याचे सौम्या पांडेय सांगतात. करोनाचा कहर सुरू असताना देखील त्या अनेक रुग्णालयांची देखरेख करताना दिसत होत्या. कोविड-१९ चा कहर लक्षात घेऊन त्या आपल्या मुलीची विशेष काळजी देखील घेत आहेत. कार्यालयातील सर्व फाइल देखील त्या पुन्हा पुन्हा सॅनिटाइझ करत असतात.

क्लिक करा आणि वाचा- १४ दिवसांचे मूल घेऊन कार्यालयात रुजू; IAS सौम्या पांडेय बनल्या आदर्श उदाहरण

गाझियाबाद जिल्हा प्रशासनाने चांगले सहकार्य केले- सौम्या

गर्भावस्थेपासून ते आतापर्यंत जिल्हा प्रशासनाने आपल्याला चांगले सहकार्य केले आणि सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्याला चांगली साथ दिल्याचे सौम्या यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांनी वेळेवर सर्व कामे पूर्ण केली. गाझियाबाद जिल्हा प्रशासनाने एका कुटुंबाप्रमाणे आपल्याला साथ दिल्याचे त्या म्हणाल्या. यामुळेच आईचा धर्म पाळून आपली जबाबदारी देखील पार पाडणे हे माझे कर्तव्यच आहे, असे त्या म्हणाल्या.

क्लिक करा आणि वाचा- केरळ सोने तस्करीत दाऊदचा हात असू शकतो: एनआयए

क्लिक करा आणि वाचा- मदरसे सरकारी पैशांनी नकोत, तर मग कुंभमेळाही नको: उदित राज

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज