मटा ऑनलाइन वृत्त । लखनऊ
'ईदच्या दिवशी रस्त्यावर होणारं नमाज पठण मी थांबवू शकत नसेन तर पोलीस ठाण्यात साजरा केल्या जाणाऱ्या जन्माष्टमीच्या उत्सवावर बंदी कशी आणू शकतो? मला तसं करण्याचा काय अधिकार आहे,' असा सवाल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.
लखनऊ येथील सायंटिंफिक कन्व्हेंशन सेंटरमध्ये आयोजित एका विशेषांकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. आधीच्या सरकारनं पोलीस ठाण्यांमध्ये जन्माष्टमी साजरी करण्यावर बंदी घातली होती. त्याबाबत योगी यांना विचारलं असता या बाबतीत आपण हतबल असल्याचं त्यांनी सांगितलं. 'सर्व जातीधर्माच्या लोकांना आपापले सण, उत्सव साजरे करण्याचं स्वातंत्र्य आहे. ख्रिसमस साजरा करा, नमाज पठण करा, काहीही करा, परंतु कायद्याच्या चौकटीत राहून करा, असं योगी म्हणाले. उत्तर प्रदेशात सरकार स्थापन झाल्यानंतर बेकायदा कत्तलखान्यावर बंदी घालण्यात आली. कावडियांना सुरक्षा देण्यात आली, असंही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं.
उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कर्जमाफीचा उल्लेख करून त्यांनी स्वत:च्या सरकारची पाठ थोपटून घेतली. 'या कर्जमाफीसाठी कोणताही अतिरिक्त कर लावला गेला नाही. काही योजनांमधील खर्चात बचत करून कर्जमाफीची व्यवस्था केली,' असं त्यांनी सांगितलं.
'ईदच्या दिवशी रस्त्यावर होणारं नमाज पठण मी थांबवू शकत नसेन तर पोलीस ठाण्यात साजरा केल्या जाणाऱ्या जन्माष्टमीच्या उत्सवावर बंदी कशी आणू शकतो? मला तसं करण्याचा काय अधिकार आहे,' असा सवाल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.
लखनऊ येथील सायंटिंफिक कन्व्हेंशन सेंटरमध्ये आयोजित एका विशेषांकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. आधीच्या सरकारनं पोलीस ठाण्यांमध्ये जन्माष्टमी साजरी करण्यावर बंदी घातली होती. त्याबाबत योगी यांना विचारलं असता या बाबतीत आपण हतबल असल्याचं त्यांनी सांगितलं. 'सर्व जातीधर्माच्या लोकांना आपापले सण, उत्सव साजरे करण्याचं स्वातंत्र्य आहे. ख्रिसमस साजरा करा, नमाज पठण करा, काहीही करा, परंतु कायद्याच्या चौकटीत राहून करा, असं योगी म्हणाले. उत्तर प्रदेशात सरकार स्थापन झाल्यानंतर बेकायदा कत्तलखान्यावर बंदी घालण्यात आली. कावडियांना सुरक्षा देण्यात आली, असंही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं.
उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कर्जमाफीचा उल्लेख करून त्यांनी स्वत:च्या सरकारची पाठ थोपटून घेतली. 'या कर्जमाफीसाठी कोणताही अतिरिक्त कर लावला गेला नाही. काही योजनांमधील खर्चात बचत करून कर्जमाफीची व्यवस्था केली,' असं त्यांनी सांगितलं.