अ‍ॅपशहर

अतिरेक्यांची घुसखोरी थांबवा, तरच शांतीवार्ता

'जोपर्यंत पाकिस्तान सीमेपलिकडून अतिरेक्यांची घुसखोरी करणं थांबवत नाही. तोपर्यंत काश्मीरमध्ये शांतता नांदणार नाही आणि पाकिस्तानबरोबर कोणतीही शांती वार्ता होणार नाही,' अशा शब्दात लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी आज पाकिस्तानला सुनावले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 May 2018, 11:26 pm
पहलगाम:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम if pak want peace stop sending terroris said army chief
अतिरेक्यांची घुसखोरी थांबवा, तरच शांतीवार्ता


'जोपर्यंत पाकिस्तान सीमेपलिकडून अतिरेक्यांची घुसखोरी करणं थांबवत नाही. तोपर्यंत काश्मीरमध्ये शांतता नांदणार नाही आणि पाकिस्तानबरोबर कोणतीही शांती वार्ता होणार नाही,' अशा शब्दात लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी आज पाकिस्तानला सुनावले.

श्रीनगर येथील पहलगाम येथे आयोजित कार्यक्रमात लष्खरप्रमुख बिपीन रावत बोलत होते. 'पाकिस्तानला खरोखरच दोन्ही देशांदरम्यान शांतता नांदावी असं वाटत असेल तर त्यांनी आधी सीमेपलिकडून अतिरेकी पाठवणं बंद करावं. घुसखोरी करणाऱ्यांना मदत करण्यासाठी पाकिस्तानकडून युद्धविरामची भाषा केली जाते,' अशी टीका करतानाच एकीकडे सीमेवर शांतता नांदावी असं म्हणायचं आणि दुसरीकडे शस्त्रसंधीचं उल्लंघन करायचं, असं दुटप्पी धोरण पाकिस्तान अवलंबत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

'सीमेवर काही गडबड झाल्यास आम्हाला त्याचं उत्तर द्यावच लागतं. अशावेळी आम्ही हातातवर हात ठेवून शांत बसू शकत नाही. शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं तर आम्ही कारवाई करणारच,' असा इशारा त्यांनी दिला. सीमेवर शांतीपूर्ण वातावरण कायम असेल तर एनआयसीओ अभियानाची गरजच पडणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज