अ‍ॅपशहर

पोलिसांचे अपयश लोकशाहीला घातकः अजित डोवल

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी ईशान्य दिल्लीतील हिंसाचारावरून पोलिसांची कानउघाडणी केलीय. पोलीस कायद्याचे पालन करत नसतील तर हे लोकशाहीसाठी घातक आहे, असं अजित डोवल म्हणाले. दरम्यान ईशान्य दिल्लीतील हिंसाचारातील मृतांची संख्या वाढून ५३ झाली आहे. ईशान्य दिल्लीतील हिंसाचार थांबवण्यासाठी अजित डोवल यांनी स्वतः तिथे भेट दिली होती. हिंसाचारामुळे प्रभावित झालेल्या नागरिकांशी त्यांनी स्वतः चर्चा केली होती.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Mar 2020, 11:06 pm
गुरुग्रामः राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी ईशान्य दिल्लीतील हिंसाचारावरून पोलिसांची कानउघाडणी केलीय. पोलीस कायद्याचे पालन करत नसतील तर हे लोकशाहीसाठी घातक आहे, असं अजित डोवल म्हणाले. दरम्यान ईशान्य दिल्लीतील हिंसाचारातील मृतांची संख्या वाढून ५३ झाली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ajit-doval


ईशान्य दिल्लीतील हिंसाचार थांबवण्यासाठी अजित डोवल यांनी स्वतः तिथे भेट दिली होती. हिंसाचारामुळे प्रभावित झालेल्या नागरिकांशी त्यांनी स्वतः चर्चा केली. त्यांच्यात विश्वास निर्माण करत शांततेचं आवाहन केलं. डोवल यांनी ईशान्य दिल्लीच्या गल्ल्यांमध्ये फिरून नागरिकांना भेटले होते. हिंसाचाराच्या तीन दिवसांनी अजित डोवल यांनी गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ही भेट दिली होती. डोवल यांनी या प्रकरणावरून केलेल्या वक्तव्याने पोलिसांना आत्मपरिक्षण करण्याची वेळ आली आहे.

पोलीस कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले तर हे लोकशाहीचं अपयश आहे, असं अजित डोवल म्हणाले. पोलीस अधीक्षकांच्या एका संमेलनात ते बोलत होते. पोलिसांचे थिंक टँक असलेल्या बीपीआरडीद्वारे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. लोकशाहीत कायदा सुव्यवस्था राखणं हे सर्वात पवित्र काम आहे. कायदा सुव्यवस्था राखणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे. पण पोलिसच यात अपयशी ठरले तर हे लोकशाहीचं अपयश ठरेल, असं अजित डोवल यांनी सांगितलं. पोलिसांनी निष्पक्ष आणि तटस्थ भावनेने कर्तव्य बजावले पाहिजे. तसंच नागरिकांमध्ये विश्वास निर्माण केला पाहिजे. जनतेत पोलिसांबद्दल रोष असता कामा नये. पोलिसांबद्दल विश्वास निर्माण झाल्यास नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अपसुकच येते, असं अजित डोवल म्हणाले.

अंकित शर्मा यांची हत्या 'टार्गेट किलिंग'?

CAA आवश्यकच; दिग्गज विधिज्ञ हरिश साळवेही आता मैदा...

दिल्लीतील हिंसाचारातील मृतांची संख्या ५३ वर

ईशान्य दिल्लीतील मृतांची संख्या वाढून ५३ वर गेली आहे. जीटीबी हॉस्पिटलमध्ये ४४, आरएमएल हॉस्पिटलमध्ये ५, एलएनजेपी हॉस्पिटलमध्ये ३ आणि एकाचा जग प्रवेश चंद्र हॉस्पिटल मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यामुळे मृतांची संख्या ५३ पर्यंत गेलीय.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज