अ‍ॅपशहर

रोहिंग्या स्थायिक झाल्यास आणखी १० काश्मीर: रामदेव

आसाममधील एनआरसीचा मुद्दा आणि त्यानंतर रोहिंग्यांविषयी संसदेत झालेल्या चर्चेनंतर या मुद्द्यांवर योगगुरू बाबा रामदेव यांनीही आवाज उठवला आहे. रोहिंग्या अवैधपणे भारतात स्थायिक झाले तर आणखी दहा काश्मीर तयार होतील, असं परखड मत त्यांनी व्यक्त केलं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Aug 2018, 2:39 pm
नवी दिल्ली:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ramdev-baba


आसाममधील एनआरसीचा मुद्दा आणि त्यानंतर रोहिंग्यांविषयी संसदेत झालेल्या चर्चेनंतर या मुद्द्यांवर योगगुरू बाबा रामदेव यांनीही आवाज उठवला आहे. रोहिंग्या अवैधपणे भारतात स्थायिक झाले तर आणखी दहा काश्मीर तयार होतील, असं परखड मत त्यांनी व्यक्त केलं.

बाबा रामदेव यांनी एनआरसीच्या मुद्द्यावरही प्रश्न उपस्थित केले. 'तीन ते चार कोटी लोक भारतात अवैधरित्या राहतात. त्यात रोहिंग्याचीही भर पडली आहे. रोहिंग्या या देशात स्थायिक झाले तर भारतात आणखी दहा काश्मीर तयार होतील,' असंही ते म्हणाले. 'रोहिंग्या मोठ्या संख्येने जम्मू-काश्मीरमध्ये आश्रित म्हणून आले आहेत. देशाच्या सुरक्षेला त्यांच्यापासून धोका निर्माण झाला आहे आणि सरकार त्याच्याशी तडजोड करणार नाही,' असं याआधी गृहराज्यमंत्री म्हणाले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज