गुवाहाटी
ओसामा बिन लादेनचा भलेही आठ वर्षांपूर्वी अमेरिकेने खात्मा केला असेल, पण आजही लादेनच्या नावाने आसाममध्ये भीतीची लाट उसळते. गेल्याच आठवड्यात आसामच्या गोलापारा जिल्ह्यात सर्वांच्या मुखी एकच प्रश्न होता, 'लादेनला पकडलं का?'... हा लादेन म्हणजे एक जंगली हत्ती आहे. याने एकाच रात्री गोलापारा भागात पाच जणांचा जीव घेतला आहे.
या हत्तीला शोधायला आठ वन्य अधिकारी ड्रोनच्या मदतीने संपूर्ण जंगल पिंजून काढत आहेत. 'लादेन' आणखी कोणाचा जीव घेण्याआधी त्याला पकडण्याचे आव्हान वनखात्यापुढे आहे. त्याला बेशुद्धीचं इंजेक्शन मारून पकडलं जाणार आहे. पण तोपर्यंत आसामचे नागरिक जीव मुठीत धरून वावरत आहेत.
यावर्षी आतापर्यंत ५७ जणांना मारले
वनविभागाच्या आकडेवारीनुसार, यावर्षी आतापर्यंत ५७ लोक जंगली हत्तींना बळी पडले आहेत. याच वर्षी जुलैमध्ये पर्यावरण आणि वन विभागाने आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार, अन्य राज्यांच्या तुलनेत आसाममध्ये हत्तींच्या हल्ल्यात मरणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.
सर्वाधिक हत्ती कर्नाटकात
२०१७ मध्ये देशातल्या २३ राज्यांमध्ये हत्तींची गणना झाली होती. याद्वारे उपलब्ध माहितीनुसार, आसाममध्ये ५,७१९ हत्ती आहेत. हत्तींच्या संख्येच्या बाबतीत आसाम देशातलं दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे. पहिल्या क्रमांकावर कर्नाटक आहे. कर्नाटकात ६,०४९ हत्ती आहेत. २०१८-१९ मध्ये आासममध्ये हत्तींच्या हल्ल्यात ८६ लोक मारले गेले. २०१७-१८ मध्ये ८३ जण तर २०१६-१७ मध्ये १३६ लोक मारले गेले होते. कर्नाटकात २०१८-१९ मध्ये १३, २०१७-१८ मध्ये २३ तर २०१६-१७ मध्ये ३८ लोक हत्तींच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडले.
२००६ मध्ये हत्ती बनला 'लादेन'
आसामच्या गावांमध्ये जंगली हत्तींची इतकी दहशत आहे की शेत, पिकांवर, गावावर हल्ला करणाऱ्या प्रत्येक जंगली हत्तीला येथे 'लादेन' असं म्हटलं जाऊ लागलं. एकाला मारलं की त्याची जागा दुसरा हत्ती घेतो. ऑनररी वाइल्ड लाइफ वॉर्डन कौशिक बरुआ म्हणाले, 'नरभक्षक जंगली हत्तीला २००६ सालापासून लादेन म्हटलं जाऊ लागलं, २००६ मध्ये सोनितपूर जिल्ह्यात एक जंगली हत्तीने डझनभर लोकांना मारले होते. याच काळात दहशतवादी बिन लादेनही चर्चेत होता. याच वर्षाच्या सुरुवातीला लादेन नावाचा हा हत्ती ठार करण्यात आला आणि दहशतवादी लादेन २०११ मध्ये ठार झाला.'
प्रत्येक जिल्ह्यात एक लादेन
लादेन नावामुळे हत्तीच्या या संहाराची चर्चा प्रसारमाध्यमांमधून होऊ लागली आणि या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष गेले. प्रत्येक जिल्ह्यात असा एक तरी लादेन आहे.
ओसामा बिन लादेनचा भलेही आठ वर्षांपूर्वी अमेरिकेने खात्मा केला असेल, पण आजही लादेनच्या नावाने आसाममध्ये भीतीची लाट उसळते. गेल्याच आठवड्यात आसामच्या गोलापारा जिल्ह्यात सर्वांच्या मुखी एकच प्रश्न होता, 'लादेनला पकडलं का?'... हा लादेन म्हणजे एक जंगली हत्ती आहे. याने एकाच रात्री गोलापारा भागात पाच जणांचा जीव घेतला आहे.
या हत्तीला शोधायला आठ वन्य अधिकारी ड्रोनच्या मदतीने संपूर्ण जंगल पिंजून काढत आहेत. 'लादेन' आणखी कोणाचा जीव घेण्याआधी त्याला पकडण्याचे आव्हान वनखात्यापुढे आहे. त्याला बेशुद्धीचं इंजेक्शन मारून पकडलं जाणार आहे. पण तोपर्यंत आसामचे नागरिक जीव मुठीत धरून वावरत आहेत.
यावर्षी आतापर्यंत ५७ जणांना मारले
वनविभागाच्या आकडेवारीनुसार, यावर्षी आतापर्यंत ५७ लोक जंगली हत्तींना बळी पडले आहेत. याच वर्षी जुलैमध्ये पर्यावरण आणि वन विभागाने आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार, अन्य राज्यांच्या तुलनेत आसाममध्ये हत्तींच्या हल्ल्यात मरणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.
सर्वाधिक हत्ती कर्नाटकात
२०१७ मध्ये देशातल्या २३ राज्यांमध्ये हत्तींची गणना झाली होती. याद्वारे उपलब्ध माहितीनुसार, आसाममध्ये ५,७१९ हत्ती आहेत. हत्तींच्या संख्येच्या बाबतीत आसाम देशातलं दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे. पहिल्या क्रमांकावर कर्नाटक आहे. कर्नाटकात ६,०४९ हत्ती आहेत. २०१८-१९ मध्ये आासममध्ये हत्तींच्या हल्ल्यात ८६ लोक मारले गेले. २०१७-१८ मध्ये ८३ जण तर २०१६-१७ मध्ये १३६ लोक मारले गेले होते. कर्नाटकात २०१८-१९ मध्ये १३, २०१७-१८ मध्ये २३ तर २०१६-१७ मध्ये ३८ लोक हत्तींच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडले.
२००६ मध्ये हत्ती बनला 'लादेन'
आसामच्या गावांमध्ये जंगली हत्तींची इतकी दहशत आहे की शेत, पिकांवर, गावावर हल्ला करणाऱ्या प्रत्येक जंगली हत्तीला येथे 'लादेन' असं म्हटलं जाऊ लागलं. एकाला मारलं की त्याची जागा दुसरा हत्ती घेतो. ऑनररी वाइल्ड लाइफ वॉर्डन कौशिक बरुआ म्हणाले, 'नरभक्षक जंगली हत्तीला २००६ सालापासून लादेन म्हटलं जाऊ लागलं, २००६ मध्ये सोनितपूर जिल्ह्यात एक जंगली हत्तीने डझनभर लोकांना मारले होते. याच काळात दहशतवादी बिन लादेनही चर्चेत होता. याच वर्षाच्या सुरुवातीला लादेन नावाचा हा हत्ती ठार करण्यात आला आणि दहशतवादी लादेन २०११ मध्ये ठार झाला.'
प्रत्येक जिल्ह्यात एक लादेन
लादेन नावामुळे हत्तीच्या या संहाराची चर्चा प्रसारमाध्यमांमधून होऊ लागली आणि या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष गेले. प्रत्येक जिल्ह्यात असा एक तरी लादेन आहे.