मटा ऑनलाइन वृत्त। पटणा
बिहार राज्यात दारूबंदी लागू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दारूबंदीचा परिणाम दिसू लागला. डॉक्टरांकडे आलेल्या व्यसनाधीन पेशंटपैकी एक आपल्या कुटुंबीयांना ओळखू शकत नव्हता, तर दुसरा नशेसाठी चक्क साबण खात होता. बुधवार पर्यंत राज्यातील ३८ नव्या नशामुक्ती केंद्रांमध्ये अशा प्रकारचे सुमारे ७५० पेशंट दाखल झाले. आपल्याच कुटुंबीयांना न ओळखणे आणि दारूला पर्याय म्हणून साबण वगैरे पदार्थ खाणे, अशी स्थिती असलेल्या ६८ पेशंटची उदाहरणे समोर आल्याचे याबाबतच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
माजी सैनिक ए.एन.सिंह यांनी अशा 'कठोर, मनमानीकारक आणि दुर्भाग्यपूर्ण' अशा या दारूबंदीच्या निर्णयाविरूद्ध पटणा हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. सरकारने घेतलेला दारूबंदीचा हा निर्णय लोकांच्या खाण्या-पिण्याच्या अधिकाराचे हनन आहे, असा आरोप सिंह यांनी केला आहे.
हॉस्पीटलमध्ये ९६ पेशंटना दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर इलाज सुरू आहे अशी माहिती बिहारच्या एका राज्य आरोग्य सोसायटीच्या अधिकाऱ्याने दिली. निर्माण झालेल्या या समस्येला तोंड देण्यासाठी, विशेषत: 'निषेध ड्राय डे'साठी १५० प्रशिक्षित डॉक्टर आणि ४५ समुपदेशकांची संख्या वाढवण्यात आली आहे.
औरंगाबाद नशामुक्ती केंद्राचे नोडल अधिकारी डॉ. आर.के. सिंह यांनी या बाबत माहिती देताना सांगितले, की त्यांच्या केंद्रात एक ३० वर्षीय व्यक्तीला दाखल करण्यात आले आहे. या व्यक्तीला आपल्या कुटुंबातील लोकांना ओळखताच येत नसल्याची तक्रार त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी केली आहे. ती व्यक्ती पूर्णपणे गोंधळलेली आहे. या व्यक्तीला भरती करण्यासाठी हॉस्पीटलला आणले गेले तेव्हा तिला साधे उभेही राहता येत नव्हते. ही व्यक्ती ३१ मार्च पर्यंत दररोज ६०० ते १२०० मिली देशी दारू प्यायचा अशी माहितीही डॉ. सिंह यांनी पुढे दिली.
बिहार राज्यात दारूबंदी लागू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दारूबंदीचा परिणाम दिसू लागला. डॉक्टरांकडे आलेल्या व्यसनाधीन पेशंटपैकी एक आपल्या कुटुंबीयांना ओळखू शकत नव्हता, तर दुसरा नशेसाठी चक्क साबण खात होता. बुधवार पर्यंत राज्यातील ३८ नव्या नशामुक्ती केंद्रांमध्ये अशा प्रकारचे सुमारे ७५० पेशंट दाखल झाले. आपल्याच कुटुंबीयांना न ओळखणे आणि दारूला पर्याय म्हणून साबण वगैरे पदार्थ खाणे, अशी स्थिती असलेल्या ६८ पेशंटची उदाहरणे समोर आल्याचे याबाबतच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
माजी सैनिक ए.एन.सिंह यांनी अशा 'कठोर, मनमानीकारक आणि दुर्भाग्यपूर्ण' अशा या दारूबंदीच्या निर्णयाविरूद्ध पटणा हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. सरकारने घेतलेला दारूबंदीचा हा निर्णय लोकांच्या खाण्या-पिण्याच्या अधिकाराचे हनन आहे, असा आरोप सिंह यांनी केला आहे.
हॉस्पीटलमध्ये ९६ पेशंटना दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर इलाज सुरू आहे अशी माहिती बिहारच्या एका राज्य आरोग्य सोसायटीच्या अधिकाऱ्याने दिली. निर्माण झालेल्या या समस्येला तोंड देण्यासाठी, विशेषत: 'निषेध ड्राय डे'साठी १५० प्रशिक्षित डॉक्टर आणि ४५ समुपदेशकांची संख्या वाढवण्यात आली आहे.
औरंगाबाद नशामुक्ती केंद्राचे नोडल अधिकारी डॉ. आर.के. सिंह यांनी या बाबत माहिती देताना सांगितले, की त्यांच्या केंद्रात एक ३० वर्षीय व्यक्तीला दाखल करण्यात आले आहे. या व्यक्तीला आपल्या कुटुंबातील लोकांना ओळखताच येत नसल्याची तक्रार त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी केली आहे. ती व्यक्ती पूर्णपणे गोंधळलेली आहे. या व्यक्तीला भरती करण्यासाठी हॉस्पीटलला आणले गेले तेव्हा तिला साधे उभेही राहता येत नव्हते. ही व्यक्ती ३१ मार्च पर्यंत दररोज ६०० ते १२०० मिली देशी दारू प्यायचा अशी माहितीही डॉ. सिंह यांनी पुढे दिली.