वृत्तसंस्था, अहमदाबाद ऑक्टोबर तसेच नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी गुजरात सरकारने ३७९५ कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा शनिवारी केली. ऑक्टोबर १५ ते नोव्हेंबर २० या ३६ दिवसांच्या कालावधीत अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या ५६ लाख ३५ हजार शेतकऱ्यांना ही नुकसानभरपाई दिली जाणार आहे. गुजरातच्या उपमुख्यमंत्र्यांनी शनिवारी ही घोषणा केली. या कालावधीत १०० मिमीपेक्षा जास्त अतिरिक्त पाऊस झालेल्या भागातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ६८०० रुपयांची (दोन हेक्टरांपर्यंत) नुकसानभरपाई दिली जाणार आहे, तर १०० मिमीपेक्षा कमी अतिरिक्त पाऊस झालेल्या भागात प्रति हेक्टरी चार हजार रुपये इतकी नुकसानभरपाई (दोन हेक्टरांपर्यंत) दिली जाणार आहे. गुजरात सरकारने अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना अभूतपूर्व मोठे पॅकेज दिले आहे, अशी प्रतिक्रिया गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी दिली. याआधी सरकारने शेतकऱ्यांसाठी ७०० कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले होते.
गुजरातमध्ये शेतकऱ्यांना ३७९५ कोटी
वृत्तसंस्था, अहमदाबादऑक्टोबर तसेच नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी गुजरात सरकारने ३७९५ कोटी ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Nov 2019, 4:00 am