अ‍ॅपशहर

काश्मीरमध्ये अतिरेक्यांची भरती घटली

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने दहशतवादविरोधी मोहीम हाती घेत अतिरेक्यांना यमसदनी पाठविण्याचा धडाका लावल्याने काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी संघटनांचं कंबरडं मोडलं आहे. लष्कराच्या कठोर कारवाईमुळे दहशतवादी संघटनांमध्ये अतिरेक्यांची भरती होणं जवळपास बंद झालं असून भरती होणाऱ्यांपेक्षा ठार होण्याचं प्रमाण वाढलं आहे.

Maharashtra Times 21 Aug 2017, 3:44 pm
मटा ऑनलाइन वृत्त । श्रीनगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम in jk more terrorists die than are recruited
काश्मीरमध्ये अतिरेक्यांची भरती घटली


जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने दहशतवादविरोधी मोहीम हाती घेत अतिरेक्यांना यमसदनी पाठविण्याचा धडाका लावल्याने काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी संघटनांचं कंबरडं मोडलं आहे. लष्कराच्या कठोर कारवाईमुळे दहशतवादी संघटनांमध्ये अतिरेक्यांची भरती होणं जवळपास बंद झालं असून भरती होणाऱ्यांपेक्षा ठार होण्याचं प्रमाण वाढलं आहे.

गुप्तचर यंत्रणेकडील आकडेवारीनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये या वर्षी दहशतवादी संघटनांमध्ये केवळ ७१ अतिरेकी भरती झाले आहेत. याउलट वर्षभरात १३२ अतिरेकी मारले गेले आहेत. २०१६च्या जुलैपर्यंत हा आकडा ७९ इतका होता. दहशतवादविरोधी कारवाईत यावर्षी खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा आकडा २०१२ आणि २०१३ मधील वार्षिक आकडेवारीपेक्षाही जास्त आहे. तर, पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधून जुलैपर्यंत ७८ दहशतवाद्यांनी घुसखोरी केली आहे. गेल्यावर्षी २०१६ मध्ये हा आकडा १२३ होता. त्यामुळे काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांची संख्या घटली असल्याचं स्पष्ट होत आहे.

लष्कराने या वर्षात मारलेल्या १३२ अतिरेक्यांमध्ये ७४ विदेशी तर ५८ स्थानिक दहशतवादी होते. त्यात लष्कर-ए-तोयबा, हिजबुल मुजाहिदीन आणि अल-बद्र या दहशतवादी संघटनांच्या १४ मोहरक्यांचा समावेश आहे. राज्य पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त कारवाईमुळेच हे शक्य झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. काश्मीर खोऱ्यात हिजबुल मुजाहिदीनचा मोहरक्या बुऱ्हान वानी गेल्या वर्षी मारला गेला. त्यानंतर झाकीर मुसा, सबजार अहमद बट आणि यासिनला मारण्यात लष्कराला यश आलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज