अ‍ॅपशहर

नव्या भारतात तुमच्या आडनावाला महत्त्व नाही: मोदी

हा भारत देश असा आहे जेथे आडनावाला महत्त्व नाही, तुमच्यात तुमची स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी काय क्षमता आहे. त्याला महत्त्व आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. मोदींनी मनोरमा न्यूज कॉन्क्लेव्हचं उद्घाटन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केलं, त्यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Aug 2019, 4:38 pm
नवी दिल्ली:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम modi

हा भारत देश असा आहे जेथे आडनावाला महत्त्व नाही, तुमच्यात तुमची स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी काय क्षमता आहे. त्याला महत्त्व आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. मोदींनी मनोरमा न्यूज कॉन्क्लेव्हचं उद्घाटन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केलं, त्यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, 'अनेक वर्षे एक वेगळीच संस्कृती इथे नांदत होती, तेथे आकांक्षा हा वाईट शब्द होता. तुमचं आडनाव किंवा वशिले पाहून तुमच्यासाठी दारं खुली व्हायची. लायसन्स राजमुळे तरुणांच्या महत्त्वाकांक्षा दडपून जायच्या. पण आता परिस्थिती बदलत आहे. आपण नव्या उमेदीने प्रगती करणारा नवा भारत पाहात आहोत.'


महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज