अ‍ॅपशहर

सरकारने ६ महिने गरिबांना पैशाची मदत केली पाहिजे: राहुल गांधी

करोनाच्या या संकटाच्या काळात आज देशातील लोकांना कर्जाची गरज नसून पैशांची गरज आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. कोविडमुळे देशात आज संकटाचे वादळ आले आहे. गोरगरीब जनतेला या वादळाचा तडाखा बसला आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 May 2020, 2:13 pm
नवी दिल्ली: कोरोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष सतत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीकास्त्रे सोडत आहे. आज गुरुवारी काँग्रेसतर्फे स्पीक अप इंडिया ही ऑनलाईन मोहीम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम गरिबांना पैशांची मदत करा- राहुल गांधी


या संदेशात राहुल गांधी केंद्र सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत. कोविडमुळे देशात आज संकटाचे वादळ आले आहे. गोरगरीब जनतेला या वादळाचा तडाखा बसला आहे. भुकेलेल्या आणि तहानलेल्या मजुरांना रस्त्यावर चालत जावे लागत आहे. छोटे व्यवसाय बंद होत आहेत. छोटे व्यवसाय हा कणा आहे. अशा परिस्थितीत आज देशातील लोकांना कर्जाची गरज नसून पैशांची गरज आहे, असे राहुल गांधी म्हणाले आहेत.

अडचणीच्या या काळात काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारकडे चार मागण्या केल्या असल्याचे राहुल गांधी म्हणाले. पाहुया, काँग्रेसने केलेल्या चार मागण्या:

> प्रत्येक गरीब कुटुंबाच्या खात्यात दरमहा ७,५०० रुपये टाकावेत.

> मनरेगा शंभर दिवसांऐवजी दोनशे दिवस करावे.

> छोट्या व्यापाऱ्यांसाठी पॅकेज जाहीर केले जावे.

> स्थलांतरित कामगारांना घरी परत जाताना सुविधा देण्यात याव्यात.

काँग्रेस पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या ऑनलाइन अभियानांतर्गत प्रत्येक नेता सोशल मीडियावर आपल्या मागण्या मांडत आहे. राहुल गांधींच्या अगोदर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एक व्हिडिओ संदेशही जारी केला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी सरकारला कामगारांसाठी तिजोरी खुली करण्याचे आवाहन केले आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन येत आहेत. यादरम्यान ते एकीकडे तज्ज्ञांशी चर्चा करत असून दुसरीकडे ते केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज