अ‍ॅपशहर

सिंधू करार तोडल्यास कोर्टात जाणार!: पाकिस्तान

उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या नाड्या आवळण्याच्या भारताच्या हालचालींमुळं पाकिस्तान हादरून गेला आहे. सिंधू पाणी कराराचा फेरविचार करण्याच्या भारताच्या निर्णयानं पाक अस्वस्थ झाला असून भारतानं पाणी तोडण्याचा निर्णय घेतल्यास आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्याचा इशारा पाकिस्ताननं दिला आहे.

Maharashtra Times 27 Sep 2016, 4:00 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम india cant separate unilaterally pak on indus
सिंधू करार तोडल्यास कोर्टात जाणार!: पाकिस्तान


उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या नाड्या आवळण्याच्या भारताच्या हालचालींमुळं पाकिस्तान हादरून गेला आहे. सिंधू पाणी कराराचा फेरविचार करण्याच्या भारताच्या निर्णयानं पाक अस्वस्थ झाला असून भारतानं पाणी तोडण्याचा निर्णय घेतल्यास आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्याचा इशारा पाकिस्ताननं दिला आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे सल्लागार सरताज अजीज यांनी पाकच्या नॅशनल असेम्ब्लीसमोर आज भूमिका मांडली. 'आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार भारत सिंधू करार एकतर्फी मोडू शकत नाही. भारतानं तसं केल्यास पाकिस्तान आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागेल, असं त्यांनी सांगितलं. 'कारगील व सियाचीन युद्धाच्या काळातही सिंधू करार स्थगित करण्यात आला नव्हता,' याची आठवणही त्यांनी दिली. 'पाकिस्तानात येणारं सिंधू नदीचं पाणी तोडणं हा आर्थिक दहशतवाद ठरेल, अशी हाकाटीही अजीज यांनी पिटली.

'रक्त व पाणी एकत्र वाहू शकत नाहीत,' अशी भूमिका मांडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधू पाणी कराराचा फेरविचार करण्यासाठी समिती नेमली आहे. पंतप्रधानांच्या या कडक पवित्र्यामुळं पाकिस्तानात चिंतातूर झाला आहे. अजीज यांनी न्यायालयीन लढाई लढण्याचं वक्तव्य करून पाकिस्तानला दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज