अ‍ॅपशहर

पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताची मोठी कारवाई, अनेक दहशतवादी ठार

पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर भारताने मोठी कारवाई केलीय. भारताने मोठी कारवाई करून दहशतवाद्यांवर एक प्रकारे सर्जिकल स्ट्राइक केल्याचं बोललं जातंय. यात अनेक दहशतवादी ठार झाल्याचं सांगण्यात येतंय. पीटीआयने हे वृत्त दिलंय. पण अशी कुठलीही कारवाई केली नसल्याचं भारतीय लष्कराने स्पष्ट केलंय.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Nov 2020, 4:12 am
नवी दिल्लीः पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये ( pok ) भारताने दहशतवादी तळांवर मोठी कारवाई ( pinpoint strikes ) केली आहे. ही कारवाई कुठे, कधी आणि कशी केली गेली हे मात्र स्पष्ट झालेलं नाही. भारतीय सैन्याकडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात ही कारवाई करण्यात आलीय. कारवाईत भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशताद्यांची अनेक तळं उद्ध्वस्त केली आहेत, अशी माहिती संरक्षण सूत्रांनी गुरुवारी दिली. दहशतवाद्यांची तळे टिपून-टिपून उद्ध्वस्त करण्यात येत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत आहेत. दुसरीकडे जागतिक स्तरावर दहशतवादविरोधी एफएटीएफकडून होणारी तपासणी टाळण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून होत आहे, असं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, पाकव्याप्त काश्मीरमध्ये कुठलीही कारवाई केली नसल्याचं भारतीय लष्कराकडून स्पष्ट करण्यात आलंय.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pinpoint strikes
पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर भारताची मोठी कारवाई ( प्रातिनिधिक फोटो )

पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर 'पिनपॉईंट स्ट्राइक' करण्यात येत आहे. पाकिस्तानी सैन्याकडू जम्मू-काश्मीरमध्ये अशांतता पसरवण्यासाठी कट रचला जात असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. अँटी टेरर वॉचडॉग FATF च्या कारवाईपासून वाचत पाकिस्तान दुसरीकडे दहशतवादाला पूर्ण पाठिंबा देत आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये सीमेवर मोठ्या प्रमाणात हालचाली दिसून आल्या आहेत. पाकिस्तानने विनाकारण भारतीय सीमेतील निवासी भागांना लक्ष्य केलं. प्रत्युत्तरात लष्कराने केलेल्या कारवाईत पाकिस्तानी सैन्याच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत, असं सूत्रांनी सांगितलं. पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळांवर (लाँचिंग पॅड) कारवाई केल्याचं सुरक्षा सूत्रांनी गुरुवारी सांगितलं.

जम्मू-काश्मीर: ट्रकमधून येत होते दहशतवादी, जवानांनी चौघांना केले ठार

दरम्यान, सीमेवर पाकिस्तानकडून आज कुठलाही गोळीबार झाला नसल्याचं, भारतीय लष्कराकडून सांगण्यात आलंय. भारतीय सैन्याकडून गेल्या काही दिवसांपासून ही कावाई सुरू असल्याचं सांगितलं जातंय. याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती भारत सरकारकडून देण्यात आलेली नाही. तर भारतीय सीमेत घुसणारा एकही दहशतवादी आता जीवंत राहणार नाही, असा इशारा लष्कर प्रमुख जनरल नरवणे यांनी दिला आहे. नगरोटामध्ये चार दहशतावाद्यांना ठार केल्यानंतर नरवणे म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज