नवी दिल्लीः लडाखमध्ये चीनशी सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लडाखच्या पूर्व भागात चिनी सैन्याच्या बांधकामावर एक सविस्तर अहवाल सरकारला सादर करण्यात आला आहे. लडाखच्या पूर्व भागात चिनी सैनिक कसे पोहोचले, याचीही सविस्तर माहिती या अहवालात देण्यात आली आहे. दौलत बेग ओल्डी सेक्टर आणि पेंगोंग सरोवर सेक्टरसह इतर ठिकाणी सीमेवर चिनी सैन्याने केलेल्या बांधकामाची माहिती या अहवालात दिली गेलीय. चिनी सैन्याकडून कशा प्रकारे या भागात मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू आहे. यामुळे चिनी सैनिक मोठ्या संख्यने याभागात दाखल होऊ शकतात याची व्यवस्था करण्यात येत आहे, हे अहवालातून स्पष्ट करण्यात आलं. देशाच्या सुरक्षा यंत्रणांनी हा अहवाल तयार केला आहे, एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलंय.
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून प्रत्यक्ष ताबा रेषेसह (LAC) लडाखच्या पूर्व भागात चीनने ५ हजारांहून अधिक सैनिकांना तैनात केलं होतं. सुरुवातील मोठ्या सैन्य तुकड्या पाठवून भारताला आश्चर्याचा धक्का देण्याचा प्रयत्न चीनने केला. यानंतर परिस्थिती पाहून अधिक उंचीवर लढण्यासाठी प्रशिक्षित असलेल्या राखीव दलाच्या सैनिकांना तिथे तैनात करण्यास सुरुवात केली. याशिवाय लडाखमध्ये आधीपासून चीनने काही सैनिक तैनात केले होते.
चिनी सैनिक एलएसीवर मेमध्ये भारतीय क्षेत्रात घुसले आहेत. ते अजूनही तिथेच आहेत. यामुळे तिथे तणावाची स्थिती कायम आहे. दोन्ही देशांचे सैनिक आमने-सामने आहेत. चिनी सैनिकांना भारतीय सीमेत खूप आतपर्यंत घुसखोरी करायची होती. पण भारतीय लष्कराने वेळेवर सैनिकांची अतिरिक्त कुमक पाठवल्याने त्यांचे मनसुबे उधळून लावण्यात आले.
सडेतोड उत्तर; भारतानेही बोफोर्सचं तोंड चीनकडे वळवलं
येत्या शनिवारी भारत-चीनमध्ये बैठक
भारत-चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये येत्या शनिवारी ६ जूनला महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत लेफ्टनंट जनरल पातळीवरील अधिकारी सहभागी होतील. या बैठकीतून वादावर तोडगा निघण्याची भारताला आपेक्षा आहे. पण सीमांबाबत कुठलीही तडजोड करणार नाही हे भारताने आधीच स्पष्ट केलं आहे. भारताला शांतता हवी आणि आपल्या देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे, असं भारताने म्हटलं आहे.
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून प्रत्यक्ष ताबा रेषेसह (LAC) लडाखच्या पूर्व भागात चीनने ५ हजारांहून अधिक सैनिकांना तैनात केलं होतं. सुरुवातील मोठ्या सैन्य तुकड्या पाठवून भारताला आश्चर्याचा धक्का देण्याचा प्रयत्न चीनने केला. यानंतर परिस्थिती पाहून अधिक उंचीवर लढण्यासाठी प्रशिक्षित असलेल्या राखीव दलाच्या सैनिकांना तिथे तैनात करण्यास सुरुवात केली. याशिवाय लडाखमध्ये आधीपासून चीनने काही सैनिक तैनात केले होते.
चिनी सैनिक एलएसीवर मेमध्ये भारतीय क्षेत्रात घुसले आहेत. ते अजूनही तिथेच आहेत. यामुळे तिथे तणावाची स्थिती कायम आहे. दोन्ही देशांचे सैनिक आमने-सामने आहेत. चिनी सैनिकांना भारतीय सीमेत खूप आतपर्यंत घुसखोरी करायची होती. पण भारतीय लष्कराने वेळेवर सैनिकांची अतिरिक्त कुमक पाठवल्याने त्यांचे मनसुबे उधळून लावण्यात आले.
सडेतोड उत्तर; भारतानेही बोफोर्सचं तोंड चीनकडे वळवलं
येत्या शनिवारी भारत-चीनमध्ये बैठक
भारत-चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये येत्या शनिवारी ६ जूनला महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत लेफ्टनंट जनरल पातळीवरील अधिकारी सहभागी होतील. या बैठकीतून वादावर तोडगा निघण्याची भारताला आपेक्षा आहे. पण सीमांबाबत कुठलीही तडजोड करणार नाही हे भारताने आधीच स्पष्ट केलं आहे. भारताला शांतता हवी आणि आपल्या देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे, असं भारताने म्हटलं आहे.