नवी दिल्ली: भारत आणि चीनी सैनिकांमध्ये लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक हाणामारीत देशाचे २० जवान शहीद झाले. या नव्याने निर्माण झालेल्या तणावानंतर देशभर संताप आहे. या घटनेनंतर आता चीनला चोख प्रत्युत्तर द्यावे अशी मागणी देशभरातून होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत देशातील विविध पक्षांचे प्रमुख सहभागी होतील.
या बैठकीत चीनशी सुरू असलेला वाद आणि आताच्या परिस्थितीवर चर्चा करण्यात येणार आहे. आज संध्याकाळी ५ वाजता ही बैठक व्हर्च्यु्अल स्वरुपात होणार आहे. या बैठकीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेते सहभागी होणार आहेत. मात्र, काही राजकीय पक्षांना या बैठकीचे आमंत्रण मिळालेले नाही, ज्यामुळे नाराजी देखील निर्माण होत आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या सर्वपक्षीय बैठकीपूर्वी सर्व प्रमुख पक्षांच्या नेत्यांना फोन करून त्यांच्याशी चर्चा केली. या बैठकीत एकूण १७ राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
वाचा: संकटावेळी रडणारा 'भारत' नव्हे; मोदींनी सांगितला 'आत्मनिर्भरते'चा अर्थundefined
हे नेते होणार बैठकीत सहभागी:
१. सोनिया गांधी
२. एम. के. स्टालिन
३. एन. चंद्रबाबू नायडू
४. शरद पवार
५. उद्धव ठाकरे
६. जगन रेड्डी
७. नीतीश कुमार
८. मायावती
९. डी. राजा
१०. सीताराम येचुरी
११. नवीन पटनायक
१२. के. चंद्रशेखर राव
१३. ममता बॅनर्जी
१४. सुखबीर बादल
१५. चिराग पासवान
१६. अखिलेश यादव
१७. हेमंत सोरेन
अनेक राजकीय पक्षांना आमंत्रण नसल्याने नाराजी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेली सर्वपक्षीय बैठक सुरू होण्यापूर्वीच वाद निर्माण झाला आहे. आम आदमी पक्षाचे ४ खासदार असून राज्यसभेतही त्यांचे प्रतिनिधी आहेत. असे असताना आम्हाला आमंत्रण मिळाले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर, दुसरीकडे राष्ट्रीय जनता दलालाही आमंत्रण मिळालेले नाही. यामुळे या बैठकीबाबत तेजस्वी यादव यांनीही प्रश्न उपस्थित केला आहे.
वाचा: चीनी सैनिकांना टक्कर देणारा शूर जवान १५ तासांनी शुद्धीवर आला, सांगितली हल्ल्याची कहाणी
ज्या पक्षांचे लोकसभेत ५ हून अधिक खासदार आहेत, अशाच पक्षांच्या प्रमुखांना आमंत्रण देण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, असे असले तीर टीडीपीचे लोकसभेत केवळ ४ खासदार असतानाही त्यांना आमंत्रण मिळालेले आहे.
वाचा: जवान निशस्त्र नव्हते, गोळी चालवायची नाही हे ठरले होते: परराष्ट्र मंत्र्यांचे उत्तर
या बैठकीत चीनशी सुरू असलेला वाद आणि आताच्या परिस्थितीवर चर्चा करण्यात येणार आहे. आज संध्याकाळी ५ वाजता ही बैठक व्हर्च्यु्अल स्वरुपात होणार आहे. या बैठकीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेते सहभागी होणार आहेत. मात्र, काही राजकीय पक्षांना या बैठकीचे आमंत्रण मिळालेले नाही, ज्यामुळे नाराजी देखील निर्माण होत आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या सर्वपक्षीय बैठकीपूर्वी सर्व प्रमुख पक्षांच्या नेत्यांना फोन करून त्यांच्याशी चर्चा केली. या बैठकीत एकूण १७ राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
वाचा: संकटावेळी रडणारा 'भारत' नव्हे; मोदींनी सांगितला 'आत्मनिर्भरते'चा अर्थundefined
हे नेते होणार बैठकीत सहभागी:
१. सोनिया गांधी
२. एम. के. स्टालिन
३. एन. चंद्रबाबू नायडू
४. शरद पवार
५. उद्धव ठाकरे
६. जगन रेड्डी
७. नीतीश कुमार
८. मायावती
९. डी. राजा
१०. सीताराम येचुरी
११. नवीन पटनायक
१२. के. चंद्रशेखर राव
१३. ममता बॅनर्जी
१४. सुखबीर बादल
१५. चिराग पासवान
१६. अखिलेश यादव
१७. हेमंत सोरेन
अनेक राजकीय पक्षांना आमंत्रण नसल्याने नाराजी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेली सर्वपक्षीय बैठक सुरू होण्यापूर्वीच वाद निर्माण झाला आहे. आम आदमी पक्षाचे ४ खासदार असून राज्यसभेतही त्यांचे प्रतिनिधी आहेत. असे असताना आम्हाला आमंत्रण मिळाले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर, दुसरीकडे राष्ट्रीय जनता दलालाही आमंत्रण मिळालेले नाही. यामुळे या बैठकीबाबत तेजस्वी यादव यांनीही प्रश्न उपस्थित केला आहे.
वाचा: चीनी सैनिकांना टक्कर देणारा शूर जवान १५ तासांनी शुद्धीवर आला, सांगितली हल्ल्याची कहाणी
ज्या पक्षांचे लोकसभेत ५ हून अधिक खासदार आहेत, अशाच पक्षांच्या प्रमुखांना आमंत्रण देण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, असे असले तीर टीडीपीचे लोकसभेत केवळ ४ खासदार असतानाही त्यांना आमंत्रण मिळालेले आहे.
वाचा: जवान निशस्त्र नव्हते, गोळी चालवायची नाही हे ठरले होते: परराष्ट्र मंत्र्यांचे उत्तर