नवी दिल्ली: भारत आणि चीन यांच्यात सैन्य स्तरावरील ( india china military talks ) चर्चेची दहावी फेरी १६ तास चालली. शनिवारी सकाळी १० वाजता ही बैठक सुरू झाली आणि रात्री २ वाजेपर्यंत ही बैठक चालली. यापूर्वी, दोन्ही शेजारी देशांनी शुक्रवारी पूर्व लद्दाखमधील पँगाँग तलावाच्या दोन्ही बाजूला सैन्य माघारीची प्रक्रिया ( disengagement process ) पूर्ण केली होती.
वरिष्ठ कमांडर स्तरावरील चर्चेच्या ताज्या फेरीत दोन्ही देशांनी डेप्सांग, हॉटस्प्रिंग्ज आणि गोग्रा भागातील सैनिकांच्या माघारीवर चर्चा केली. ही चर्चा चुशुल सेक्टरमधील पँगाँग सरोवराच्या दक्षिणेस मोल्दो येथे चिनी बाजूने म्हणजे LAC (प्रत्यक्ष ताबा रेषा) च्या दुसऱ्या बाजूला झाली.
या चर्चेच्या केंद्रस्थानी सैन्य माघारीच्या प्रक्रियेला चालना देण्यावर भर देण्यात आला आहे. त्याच्या कार्यपद्धतींवर चर्चा करण्यासाठी दोन्ही बाजूंची बैठक झाली, असं सूत्रांनी सांगितल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे.
pamela goswami : धक्कादायक! कोकेन प्रकरणी पामेलांनी घेतले भाजपच्या बड्या नेत्याचे नाव
एप्रिल २०२० मध्ये उंचीवर असलेल्या सीमेवर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही देश गेल्या नऊ महिन्यांपासून मुत्सद्दी आणि सैन्य स्तरावर चर्चा करत आहेत. लडाखच्या गलवान खोऱ्यात दोन्ही बाजूंच्या सैनिकांदरम्यान रक्तरंजित संघर्ष झाला. यात भारताचे २० जवान शहीद झाले. तर चीनचे ३५ हून अधिक सैनिक ठार झाल्याचं सांगण्यात येतंय. पण चीनने फक्त ५ सैनिक ठार झाल्याचं म्हटलं आहे.
farmers protest : शेतकरी आंदोलनामुळे भाजप अस्वस्थ; अमित शहांच्या नेत्यांना सूचना
वरिष्ठ कमांडर स्तरावरील चर्चेच्या ताज्या फेरीत दोन्ही देशांनी डेप्सांग, हॉटस्प्रिंग्ज आणि गोग्रा भागातील सैनिकांच्या माघारीवर चर्चा केली. ही चर्चा चुशुल सेक्टरमधील पँगाँग सरोवराच्या दक्षिणेस मोल्दो येथे चिनी बाजूने म्हणजे LAC (प्रत्यक्ष ताबा रेषा) च्या दुसऱ्या बाजूला झाली.
या चर्चेच्या केंद्रस्थानी सैन्य माघारीच्या प्रक्रियेला चालना देण्यावर भर देण्यात आला आहे. त्याच्या कार्यपद्धतींवर चर्चा करण्यासाठी दोन्ही बाजूंची बैठक झाली, असं सूत्रांनी सांगितल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे.
pamela goswami : धक्कादायक! कोकेन प्रकरणी पामेलांनी घेतले भाजपच्या बड्या नेत्याचे नाव
एप्रिल २०२० मध्ये उंचीवर असलेल्या सीमेवर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही देश गेल्या नऊ महिन्यांपासून मुत्सद्दी आणि सैन्य स्तरावर चर्चा करत आहेत. लडाखच्या गलवान खोऱ्यात दोन्ही बाजूंच्या सैनिकांदरम्यान रक्तरंजित संघर्ष झाला. यात भारताचे २० जवान शहीद झाले. तर चीनचे ३५ हून अधिक सैनिक ठार झाल्याचं सांगण्यात येतंय. पण चीनने फक्त ५ सैनिक ठार झाल्याचं म्हटलं आहे.
farmers protest : शेतकरी आंदोलनामुळे भाजप अस्वस्थ; अमित शहांच्या नेत्यांना सूचना